मुंबई : राज्यात मागील काहि दिवसात झालेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झालेत. यानंतर राज्यातील विविध राजकीय नेत्यांनी नुकसान ग्रस्त भागाची पाहणी केली. यातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील औरंगाबाद येथे येऊन गेले. त्यानंतर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली. यावरून कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांनी शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना चॅलेज दिलं आहे.
“आदित्य ठाकरेंची पत्रकार परिषद म्हणजे, बालिश बहू बडबडला ;” शीतल म्हात्रे
त्यांचे वडिल आमच्या औरंबादमध्ये आले. अडीच तासाचा त्यांचा दौरा अन् त्यामध्ये 24 मिनिटे शेतकऱ्यांच्या बांधावर राहिले. तसेच आम्ही चोविस दिवसापासून फिरू लागलो. तरी ओला दुष्काळाची परिस्थिती आम्हाला दिसली नाही. आणि यांना 24 मिनिटांमध्ये काय दिसलं असेल मला माहिती नाही. असा खोटक टोला देखील अब्दूल सत्तार यांनी आदित्य़ ठाकरेंना लगावला.
“गुवाहाटीवरून तर फडणवीसांनी बच्चू भाऊंचे अंतर्वस्त्रच काढले”; राष्ट्रवादीने डिवचलं
तसेच आदित्य ठाकरे यांनी वरळीमधून राजीनामा द्यावा, मी सिल्लोड मधून राजीनामा देतो असं आवाहन करत ते म्हणाले की,तुम्हाला दोन वर्षानंतर माहिती पडेल. परंतु दोन वर्षाची वाट कशाला बघता. दोघांमधली टेस्ट मॅच होऊन जाऊद्या. मग कळेल की दुध का दुध पाणी पाणी होईल. असं आवाहन देखील कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलं आहे.
आंदोलकांचा फडणवीसांकडून ‘शेंबडी पोरं’ म्हणून उल्लेख..! आदित्य ठाकरे म्हणाले….
दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या परतीच्या पावसाने राज्यातील खास करून मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. यानंतर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली. परंतु अजूनही ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली नसल्याचं कृषीमंत्र्यांनी सांगितलं. त्यावर आदित्य ठाकरेंनी त्यांच्यावर जोरदार टिका केली होती.
Read also
- पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प ठरवणार शिरुर लोकसभेतील भाजपाचा उमेदवार !
- “शिंदे- फडणवीस कायम सोबत राहतील, ते कधीही तुटणार नाहीत”; नवनीत राणा
- “तारीख पे तारीख.. अजून किती?” शिंदे-ठाकरेंची सुनावणी पुन्हा लांबणीवर
- “आम्ही बंड केल्यामुळेच सुषमा ताईंची महाराष्ट्रात ओळख झाली”; शिंदे गटाच्या आमदाराचं वक्तव्य
- ” हा तर म्हणजे लंगोट घेऊन अंगातील कपडे देण्याचा प्रकार”; मिटकरींनी फडणवीसांना डिवचलं