अमरावती : आज सर्वोच्च न्यायालयाने शिंदे-ठाकरे यांची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर ढकलली आहे. आता यापुढील सुनावणी 29 नोव्हेंबरला होणार आहे. याच पार्श्वभूमीवर अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सत्तासंघर्ष हा उद्धव ठाकरेंसाठी आहे. तो एकनाथ शिंदे यांच्यासाठी नव्हे. कारण 56 वर्षाची परंपरा उद्धव ठाकरे यांनी गमवली आहे. असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.
आंदोलकांचा फडणवीसांकडून ‘शेंबडी पोरं’ म्हणून उल्लेख..! आदित्य ठाकरे म्हणाले….
पक्षातील माणसे, कार्यकर्ते जपुन ठेवणे ही सर्वात मोठी आपली संपत्ती असते. मात्र 56 वर्षातील वडिलांची परंपरा उद्धव ठाकरे यांनी गमावलीय. त्यामुळे सत्तासंघर्ष हा आता उद्धव ठाकरे यांना करावा लागत आहे. तो एकनाथ शिंदे यांना करावा लागणार नाही. असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. तसेच यावर अधिक बोलणं योग्य ठरणार नाही. पण 2024 नंतर देखील एकनाथ शिंदे अन् फडणवीस सोबत राहतील. ते कधीही तुटणार नाहीत. असा विश्वास देखील राणांनी व्यक्त केला.
फडणवीसांनी कागदपत्रासह पुरावे दाखविले; ठाकरेंनी थेट ‘वन टू वन’ करण्याचं दिले आव्हान
बंडखोर आमदारांमध्ये नाराजी असल्याचं म्हणणं उद्धव ठाकरे यांनी सांगू नये. कारण ज्या पद्धतीने शिवसेनेतील 40 आमदार शिंदे गटात आले. त्यावरून त्यांना बोलण्याचा काहीही अधिकार नाही. उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे यांच्यात मोठा फरक आहे. एकनाथ शिंदे हे जनतेचे मुख्यमंत्री आहेत. ते लोकांचे काम व्यवस्थित करीत आहेत. एखाद्या व्यक्तींनी त्यांना जर फोन केला तर ते लगेचच कॉल बॅक करतात. असंही त्या म्हणाल्या.
“माजले होते बोके, कोरोनात खाऊन खोके, आता होणार चौकशी ओके”; शेलारांचा टोला
दरम्यान, मागील काही दिवसापासून राज्यात विविध मुद्यांवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोपांच्या फैऱ्या सुरू होत्या.
Read also
- “तारीख पे तारीख.. अजून किती?” शिंदे-ठाकरेंची सुनावणी पुन्हा लांबणीवर
- “आम्ही बंड केल्यामुळेच सुषमा ताईंची महाराष्ट्रात ओळख झाली”; शिंदे गटाच्या आमदाराचं वक्तव्य
- ” हा तर म्हणजे लंगोट घेऊन अंगातील कपडे देण्याचा प्रकार”; मिटकरींनी फडणवीसांना डिवचलं
- “आदित्य ठाकरेंची पत्रकार परिषद म्हणजे, बालिश बहू बडबडला ;” शीतल म्हात्रे
- “गुवाहाटीवरून तर फडणवीसांनी बच्चू भाऊंचे अंतर्वस्त्रच काढले”; राष्ट्रवादीने डिवचलं