मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारला. त्यानंतर शिवसेनेचे जवळपास 40 आमदार आणि 12 खासदारांसह पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. त्यानंतर आम्हीच शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची न्यायालयीन लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरू झाली. त्यावर आज सुनावणी करण्यात आली.
फडणवीसांनी कागदपत्रासह पुरावे दाखविले; ठाकरेंनी थेट ‘वन टू वन’ करण्याचं दिले आव्हान
एकनाथ शिंदे यांनी 20 जुन रोजी शिवसेनेविरोधात बंड पुकारला. त्यांनी भाजपसोबत येत सरकार स्थापन केलं. मग त्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाकडून शिवसेनेवर दावा ठोकण्यात आला. त्यावर आज सुनावणी करण्यात आली. सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंच्या गटाला कागदपत्रे सादर करण्यासाठी आणखी मुदत वाढवून दिली आहे. त्यामुळे याची पुढील सुनावणी आता 29 नोव्हेंबर ला होणार आहे.
“माजले होते बोके, कोरोनात खाऊन खोके, आता होणार चौकशी ओके”; शेलारांचा टोला
सर्वोच्च न्यायालयाने शिंदे-ठाकरे यांची राजकीय लढाईबाबत आणखी दिवस वाढवून दिल्याबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या लढाईबाबत कधी होणार ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच तारिख पे तारिख दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये देखील आता नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी सुनावणीत आता काय निर्णय होणार की अजून सुनावणी पुढे ढकलली जाणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
12,000,00,00,000…! या आकड्याची आता CAG कडून चौकशी: चित्रा वाघ यांनी सेनेला डिवचलं
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात कागदपत्रे सादर केली आहेत. तसेच शिंदे गटातील नेत्यांनी देखील सर्वोच्च न्यायालयात आपण खरी शिवसेना असल्याचं म्हणत मोठ्या प्रमाणात कागदपत्रे सादर केली आहेत. यातच आता निवडणुक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण गोठवल्याने ठाकरे आणि शिंदे गटाला याचा फटका बसला आहे.
Read also
- “आम्ही बंड केल्यामुळेच सुषमा ताईंची महाराष्ट्रात ओळख झाली”; शिंदे गटाच्या आमदाराचं वक्तव्य
- ” हा तर म्हणजे लंगोट घेऊन अंगातील कपडे देण्याचा प्रकार”; मिटकरींनी फडणवीसांना डिवचलं
- “आदित्य ठाकरेंची पत्रकार परिषद म्हणजे, बालिश बहू बडबडला ;” शीतल म्हात्रे
- “गुवाहाटीवरून तर फडणवीसांनी बच्चू भाऊंचे अंतर्वस्त्रच काढले”; राष्ट्रवादीने डिवचलं
- आंदोलकांचा फडणवीसांकडून ‘शेंबडी पोरं’ म्हणून उल्लेख..! आदित्य ठाकरे म्हणाले….