मुंबई : मागील काही दिवसापासून महाराष्ट्रातील प्रकल्प बाहेर गेल्यावरून वाद सुरू आहे. यामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपांच्या फैऱ्या सुरू आहेत. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर चिखलफेक सुरू आहे. यातच काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. त्याला लागेचच शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं. त्यावर आता शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
“काळजी करू नका..! मोदींनी महाराष्ट्राला 2000 कोटींची भेट दिली”; देवेंद्र फडणवीस
आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद पाहिल्यावर बालिश बहू बडबडला, हेच वाक्य आठवतेे. आपले वय, आपला अनुभव आणि आपण काय बोलत आहोत. याबाबत आदित्य ठाकरे यांनी विचार करणे गरजेचे आहे. आदित्य ठाकरे वरळीचे आमदार आहेत. तिथे लक्ष दिले तर अधिक बरे होईल. मात्र, तेथील मूळ आमदार असलेले सुनील शिंदे हेच चांगले होेते. अशी भावना जनतेच्या मनात निर्माण झाली आहे. वरळीमध्ये ज्या पद्धतीने काम सुरू आहे. याचे उत्तर पुढील निवडणुकीत जनताच तुम्हाला देईल. असंही त्या म्हणाल्या.
“प्रत्येक प्रकल्प गुजरातलाच का जातो? पंतप्रधानांचा विचार विशाल असायला हवं”; राज ठाकरे
देवेंद्र फडणवीस यांनी काल महाराष्ट्रातील प्रकल्प बाहेर जाण्यास महाविकास आघाडी सरकार कारणीभूत असलेल्याचे पुरावे काल पत्रकार परिषदेत सादर केले. यातच वेदांता फॉक्सकॉन आणि टाट एअरबस प्रकल्प हे आघाडी सरकार असताना त्यांनी बाहेर जाण्याचा निर्णय घेतला होता. तसेच त्यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी मला येथील वातावरण ठिक नसल्याचे सांगितले. त्यानंतर उद्धव ठाकरे सरकारने याचा कोणताही पाठपुरावा केला नाही. असा आरोप फडणवीसांनी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर लावला आहे.
“शरद पवार यांची तब्बेत बिघडली..! ब्रीच रूग्णालयात दाखल
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी काल देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर म्हणून पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी आमच्या सरकारमधील उद्योग मंत्र्यांनी प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी कशापद्धीतीने काळजी घेतली होती. अन् हे प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जाण्यास शिंदे-फडणवीस सरकार कारणीभूत असल्याचं आदित्य़ ठाकरे यांनी म्हटलं होतं.
Read also
- “गुवाहाटीवरून तर फडणवीसांनी बच्चू भाऊंचे अंतर्वस्त्रच काढले”; राष्ट्रवादीने डिवचलं
- आंदोलकांचा फडणवीसांकडून ‘शेंबडी पोरं’ म्हणून उल्लेख..! आदित्य ठाकरे म्हणाले….
- फडणवीसांनी कागदपत्रासह पुरावे दाखविले; ठाकरेंनी थेट ‘वन टू वन’ करण्याचं दिले आव्हान
- “माजले होते बोके, कोरोनात खाऊन खोके, आता होणार चौकशी ओके”; शेलारांचा टोला
- 12,000,00,00,000…! या आकड्याची आता CAG कडून चौकशी: चित्रा वाघ यांनी सेनेला डिवचलं