जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांना मोठा फटका बसला. 40 आमदार आणि 12 खासदार पक्षातून गेल्यानंतर शिवसेनेला उतरती कळा लागली. त्यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी न्यायालयीन कोठडी ठोठवण्यात आल्यानंतर सेनेच्या बाजूने बोलण्यास आक्रमक नेता पक्षात राहिला नाही. यातच सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. अन् उद्धव ठाकरेंनी त्यांना लगेचच उपनेते पद दिलं. त्यानंतर सुषमा अंधारे बंडखोर नेत्यांवर बरसू लागल्या. यातच त्यांची आता जळगावमध्ये प्रबोधन सभा होत आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी अंधारे यांच्याबाबत एक वक्तव्य केलं आहे.
“माजले होते बोके, कोरोनात खाऊन खोके, आता होणार चौकशी ओके”; शेलारांचा टोला
जळगावमध्ये सुषमा अंधारे यांची सभा होत आहे. त्याआधी किशोर पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, शिंदे गटातील आमदारांच्या बंडखोरीआधी सुषमा अंधारे यांना महाराष्ट्रात कुणीही ओळखत नव्हतं.
12,000,00,00,000…! या आकड्याची आता CAG कडून चौकशी: चित्रा वाघ यांनी सेनेला डिवचलं
मागच्या तीन महिन्यांपुर्वी सुषमाताई अंधारे कुठे आहेत. हे अंधारात सुद्धा दिसत नव्हत्या. अशा प्रकाराची परिस्थिती अंधारे ताईंची होती. परंतु आज आम्ही बंड केल्यामुळे आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर या महाराष्ट्रात अंधारे ताई कोण आहेत. हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती पडलंय अशी प्रतिक्रिया किशोर पाटील यांनी दिली आहे.
“काळजी करू नका..! मोदींनी महाराष्ट्राला 2000 कोटींची भेट दिली”; देवेंद्र फडणवीस
तसेच पुढे बोलताना किशोर पाटील यांनी असं म्हटलं आहे की, सुषमा अंधारे यांनी 40 बंडखोर आमदारांचं स्वागत केलं पाहिजे. त्यांच्यामुळे त्यांना महाराष्ट्रात नवी ओळख मिळाली आहे. आम्ही बंड केलं नसतं तर ताईंना महाराष्ट्रात कुणीही ओळखलं नसतं. असं म्हणत त्यांनी सुषमा अंधारे यांच्या जळगावमधील महाप्रबोधन सभेसाठी स्वागत केलं आहे. त्यांनी यावं आणि आपली सभा घ्यावी. आम्हाला त्याची काही हरकत नाही. असंही ते म्हणाले.
Read also
- ” हा तर म्हणजे लंगोट घेऊन अंगातील कपडे देण्याचा प्रकार”; मिटकरींनी फडणवीसांना डिवचलं
- “आदित्य ठाकरेंची पत्रकार परिषद म्हणजे, बालिश बहू बडबडला ;” शीतल म्हात्रे
- “गुवाहाटीवरून तर फडणवीसांनी बच्चू भाऊंचे अंतर्वस्त्रच काढले”; राष्ट्रवादीने डिवचलं
- आंदोलकांचा फडणवीसांकडून ‘शेंबडी पोरं’ म्हणून उल्लेख..! आदित्य ठाकरे म्हणाले….
- फडणवीसांनी कागदपत्रासह पुरावे दाखविले; ठाकरेंनी थेट ‘वन टू वन’ करण्याचं दिले आव्हान