पुणे : विशेष प्रतिनिधी पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीत शिरुर मतदार संघातील ‘पॉलिटिकल मायलेज’चा विषय झाला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडसह अहमदनगर, नाशिक अशा तीन जिल्ह्यातून जाणारा हा प्रकल्प आता तांत्रिक अडचणीत अडकला आहे. शिरुर मतदार संघात सर्वाधिक भूसंपादन झालेले असताना, अंतिम टप्प्यात प्रकल्प बरगळे हे राजकीय आणि धोरणात्मक अपयश आहे. त्यामुळे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान, भारतीय जनता पार्टीचा एकूण अजेंडा पाहता पुणे- नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचे काम मार्गी लागलेच, तर त्याचे श्रेय लोकसभा निवडणुकीत घेण्याची एकही संधी भाजपाचे केंद्रीय आणि राज्यातील नेतृत्व सोडणार नाही. त्यामुळे आजी किंवा माजी दोघांपैकी एकाला या प्रकल्पाचे श्रेय मिळणार असून, त्याचवेळी आगामी निवडणुकीतील भाजपाचा अधिकृत उमेदवार कोण असेल? यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
“गुवाहाटीवरून तर फडणवीसांनी बच्चू भाऊंचे अंतर्वस्त्रच काढले”; राष्ट्रवादीने डिवचलं
शिरुर लोकसभा मतदार संघात केंद्रातील आणि राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने विशेष ‘लक्ष्य’ घातले आहे. ‘लोकसभा प्रवास उपक्रमांतर्गत राज्यातील १६ मतदार संघांची निवड केली. त्यामध्ये शिरुरचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी, केंद्रीय आदिवासी विकास मंत्री रेणुका सिंह यांनी मतदार संघाचा दौरा केला. प्रदेश आणि राज्य कार्यकारिणीतील मोठे पदाधिकारी यांनी बैठका- कार्यक्रमांचा सपाटा लावला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शिरुरची जागा जिंकायची, असा संकल्प निवडणूक प्रभारी आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनी केला आहे, हे स्पष्ट होते. २०२४ लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना अशी महायुती होणार यात शंका नाही. कारण, आगामी निवडणुका एकत्रितपणे लढण्याबाबत द्विपक्षाचे स्थानिक निर्णायक नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात एकवाक्यता दिसते. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे वेळीच सावध भूमिका घेत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ‘बाळासाहेबांची शिवसेना’ मध्ये प्रवेश केला.
आंदोलकांचा फडणवीसांकडून ‘शेंबडी पोरं’ म्हणून उल्लेख..! आदित्य ठाकरे म्हणाले….
दुसरीकडे, महाविकास आघाडी अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी काही दिवसांपासून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची सलोखा वाढवला आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह, नितीन गडकरी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत कोल्हे यांनी भूमिका सामंजस्याची दिसते. राज्यातील सत्ता परिवर्तन झाल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते भाजपा आणि फडणवीस-शिंदे जोडीवर तुटून पडलेले असताना डॉ. कोल्हे यांच्या विरोधीचा धार कमी झालेली पहायला मिळते. त्यामुळे डॉ. कोल्हे यांची भाजपाशी जवळीक वाढली आहे अशी चर्चाही राजकीय वर्तुळात आहे. आता पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी खासदार डॉ. कोल्हे यांनी बाह्या खेचल्या आहेत. कोणत्याही परिस्थित हा प्रकल्प स्थगित होता कामा नये. अन्यथा कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला मतदार संघात फिरता येणार नाही. यासाठी केंद्रीय मंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी बैठक घेणार असून, त्यातून मार्ग निघाला नाही, तर जनआंदोलन उभारणार असल्याचा निर्धार डॉ. कोल्हे यांनी केला आहे.
फडणवीसांनी कागदपत्रासह पुरावे दाखविले; ठाकरेंनी थेट ‘वन टू वन’ करण्याचं दिले आव्हान
लोकसभा निवडणूक ‘कमळ’ चिन्हावर…
राज्यात बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपात महायुती झाली असली, तरी आगामी लोकसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष ‘बाळासाहेबांची शिवसेना’ भाजपाच्या ‘कमळ’ चिन्हावरच लढवण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेसाठी केंद्रात आपले वजन वापरतील. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या मदतीने प्रकल्प मंजूर करुन आणतील. त्याद्वारे राजकीय श्रेयाचा मुद्दा करुन भाजपाच्या तिकीटावर लोकसभा लढवतील. दुसरीकडे, भाजपा केंद्रीय नेतृत्वाच्या माध्यमातून डॉ. अमोल कोल्हे यांना याच प्रकल्पाच्या मुद्यावर भाजपा प्रवेशासाठी पाचारण करतील. आढळराव आणि कोल्हे यांच्यात राज्यसभा आणि लोकसभा असा समझोता होईल आणि विकासाच्या मुद्यावर शिरुरची जागा भाजपा याच दोन दिग्गज नेत्यांच्या मदतीने काबिज करेल, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे. त्यामुळे पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प आणि भाजपाची रणनिती पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Read also
- “शिंदे- फडणवीस कायम सोबत राहतील, ते कधीही तुटणार नाहीत”; नवनीत राणा
- “तारीख पे तारीख.. अजून किती?” शिंदे-ठाकरेंची सुनावणी पुन्हा लांबणीवर
- “आम्ही बंड केल्यामुळेच सुषमा ताईंची महाराष्ट्रात ओळख झाली”; शिंदे गटाच्या आमदाराचं वक्तव्य
- ” हा तर म्हणजे लंगोट घेऊन अंगातील कपडे देण्याचा प्रकार”; मिटकरींनी फडणवीसांना डिवचलं
- “आदित्य ठाकरेंची पत्रकार परिषद म्हणजे, बालिश बहू बडबडला ;” शीतल म्हात्रे