मुंबई : रवी राणा यांची ही पहिलीच वेळ असल्याचं सांगत अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी देखील रवी राणांना माफ केले. मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या रवी राणा-अन् बच्चू कडू यांच्यातील वाद मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने मिटला. याआधी नकळत माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले असं म्हणत रवी राणांनी बच्चू कडूंची जाहीर माफी मागितली होती. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यावर भाष्य केलं आहे.
रवी राणा यांनी नुसती माघार घेऊन कसे चालेल. मला वाईट वाटते, बच्चू कडू आमचा भाऊ आहे. रवी राणा त्यांचा अशाप्रकारे अपमान करू शकत नाहीत. रवी राणा यांनी अक्षम्य चुक केलेली आहे. तुम्ही एका मान्यताप्राप्त लोकप्रतिनिधीची प्रतिमा मलिन करता, त्याच्या प्रतिमेला आणि विश्वासर्हतेला तडा जाईल, अशी विधाने करता. त्यामुळे अशी सवंग, उथळ आणि बेजबाबदरा वक्तव्य करणाऱ्या सदस्याचे सभागृहाचे सदस्यत्व रद्द करण्याची जबाबदारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे. असं अंधारे यांनी म्हटलं आहे.
पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प ठरवणार शिरुर लोकसभेतील भाजपाचा उमेदवार !
तसेच पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, रवी राणा यांची आमदारकी रद्द करण्याचा ठराव विधानसभेत मांडला पाहिजे. फक्त माफीने काम चालणार नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. रवी राणा यांचा राजीनामा घेतला गेला नाही तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याविषयी असा समज होईल की, तुमचे पडद्यामागून वेगळे कारस्थान सुरू आहे. असंही त्या म्हणाल्या.
“शिंदे- फडणवीस कायम सोबत राहतील, ते कधीही तुटणार नाहीत”; नवनीत राणा
दरम्यान, अपक्ष आमदार रवी राणा आणि प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्यातील वाद टोकाला गेला होता. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्याने हा वाद मिटला. तसेच रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून बच्चू कडू यांची जाहीर माफी मागितली. आज बच्चू कडू यांनी देखील जाहीर मेळावा घेत आपली भूमिका स्पष्ट केली.
Read also
- “राणा, कंभोज, खोत, सदावर्ते, पडळकरांना आता फडणवीसांनी गुजरातला पाठवावे”
- “रवी राणांनी माझी माफी मागितली, त्यांचे जाहीर आभार”; बच्चू कडूंनी वाद मिटवला
- “प्रहार काही आंडूपांडूचा पक्ष नाही, प्रहारमध्ये दहा वार करण्याची ताकद”; बच्चू कडू
- “सत्ता चुलीत गेली, आम्ही जनसामान्यांसाठी सरकारला पाठींबा दिला”; बच्चू कडूंचा एल्गार प्रहार
- “हम तो वो बदनाम है की बदनामी हमसे डरती है”; गुलाबराव पाटलांची शायरी