मुंबई : मागील काही दिवसापासून राज्यातील प्रकल्प गुजरातला गेल्याने राज्यात वाद निर्माण झाला आहे. आता पर्यंत महाराष्ट्रातून चार मोठे प्रकल्प बाहेरच्या राज्यात गेले आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळत आहे. यावरूनच आता राष्ट्रवादीने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प ठरवणार शिरुर लोकसभेतील भाजपाचा उमेदवार !
राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी फडणवीसांवर जोरदार टिका केली आहे. ते म्हणाले की, शिंदे फडणवीसांनी महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पाठवले. आता देवेंद्र फडणवीस यांनी आता सोमय्या, राणा, कंभोज, खोत, पडळकर, सदावर्ते या उरलेल्या नगांना सुद्धा गुजरातमध्ये पाठवावे, म्हणजे महाराष्ट्रात सुख, शांती, समाधान नांदेल. असा टोला देखील त्यांनी लगावला.
“शिंदे- फडणवीस कायम सोबत राहतील, ते कधीही तुटणार नाहीत”; नवनीत राणा
राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना रवी राणा, किरीट सोमय्या, मोहित कंभोज, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, गुणरत्ने सदावर्ते यांनी प्रखरपणे टिका केली. त्यावेळी भाजपच्या नेत्यांनी आघाडी सरकारवर सातत्याने टिकास्त्र सोडले होते. त्यावरून आता रविकांत वरपे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी रवी राणा आणि बच्चू कडू यांच्या वादवार देखील खोचक टोला हाणला आहे.
“तारीख पे तारीख.. अजून किती?” शिंदे-ठाकरेंची सुनावणी पुन्हा लांबणीवर
50 खोक्यांचा कडू वाद गोड होऊन मिटेल, 25 खोक्यांचा वाटा जेव्हा राणा साहेबांना भेटेल असं म्हणत त्यांनी रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यावर निशाणा साधला. अलिकडेच राज्यात रवी राणा अन् बच्चू कडू यांच्यातील वाद टोकाला पोहचला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला.
Read also
- “रवी राणांनी माझी माफी मागितली, त्यांचे जाहीर आभार”; बच्चू कडूंनी वाद मिटवला
- “प्रहार काही आंडूपांडूचा पक्ष नाही, प्रहारमध्ये दहा वार करण्याची ताकद”; बच्चू कडू
- “सत्ता चुलीत गेली, आम्ही जनसामान्यांसाठी सरकारला पाठींबा दिला”; बच्चू कडूंचा एल्गार प्रहार
- “हम तो वो बदनाम है की बदनामी हमसे डरती है”; गुलाबराव पाटलांची शायरी
- “तुम्ही तिकडून राजीनामा द्या, मी सिल्लोडमधून देतो, बघू मग काय होतं ते”; सत्तारांचं आदित्य ठाकरेंना आव्हान