अमरावती : नाव जरी बच्चू असेल आणि आ़डनाव जरी कडू असलं तरी त्यात सुगर नाही. काहीही खाल्लं तर त्याच्यासोबत कडू आहे. निर्णय कडू आहेत. पण आमचं काम गोड आहे. आज कोणत्या पक्षात बंडखोर नाहीत. प्रत्येक पक्षात बंडखोर आहेत. त्यामुळे आमच्या वाटेला जालं तर कोथळा बाहेर काढू. तसेच आमचा पक्ष जरी लहान असला तरी दिलदार आहे. असं म्हणत प्रहाराचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी आपल्या जाहीर मेळाव्यात टिकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
“आम्ही बंड केल्यामुळेच सुषमा ताईंची महाराष्ट्रात ओळख झाली”; शिंदे गटाच्या आमदाराचं वक्तव्य
आमची ही वेळ पहिलीच वेळ आहे. त्यामुळे कोणीही यावं आणि आमच्यावर बोलावं, इतकं सोप्प नाही. त्यामुळे पुढे जेव्हा आमचा प्रहारचा वार पडेल, तेव्हा योग्य होणार नाही. तसेच आम्ही देखील आचारसहिंता पाळू, कुणाचं मन दुखणार असं कधी बोलणार नाही. परंतु जो कोणी आमच्याबद्दल बोलणार त्यांना सोडणार नाही. आमच्या मंत्रीपदाचा फायदा गरिबांपर्यंत पोहचवण्याचा काम आम्ही केलं आहे. असंही बच्चू कडू म्हणाले.
” हा तर म्हणजे लंगोट घेऊन अंगातील कपडे देण्याचा प्रकार”; मिटकरींनी फडणवीसांना डिवचलं
प्रहाराच्या व्यासपीठावर दोनच आमदार आहेत. पंरतु येत्या काळात दहा जण या व्यासपीठावर बसतील. दहा आमदारांची तयारी आम्ही सुरू केली आहे. आम्ही म्हटलं तर सरकार बसलं पाहिजे अन् आम्ही म्हटलं तर सरकार उठलं पाहिजे. असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. तसेच सत्ता चुलीत गेली आम्ही सर्वसामान्यांसाठी सरकारला पाठींबा दिला असं देखील ते म्हणाले.
Read also
- “हम तो वो बदनाम है की बदनामी हमसे डरती है”; गुलाबराव पाटलांची शायरी
- “तुम्ही तिकडून राजीनामा द्या, मी सिल्लोडमधून देतो, बघू मग काय होतं ते”; सत्तारांचं आदित्य ठाकरेंना आव्हान
- पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प ठरवणार शिरुर लोकसभेतील भाजपाचा उमेदवार !
- “शिंदे- फडणवीस कायम सोबत राहतील, ते कधीही तुटणार नाहीत”; नवनीत राणा
- “तारीख पे तारीख.. अजून किती?” शिंदे-ठाकरेंची सुनावणी पुन्हा लांबणीवर