अमरावती : अपक्ष आमदार रवी राणा आणि प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्यातील वाद टोकाला गेला होता. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्याने हा वाद मिटला. तसेच रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून बच्चू कडू यांची जाहीर माफी मागितली. आज बच्चू कडू यांनी देखील जाहीर मेळावा घेत आपली भूमिका स्पष्ट केली.
“शिंदे- फडणवीस कायम सोबत राहतील, ते कधीही तुटणार नाहीत”; नवनीत राणा
मागील काही दिवसापासून रवी राणा आणि बच्चू कडू वाद विकोपाला गेला होता. यामध्ये बच्चू कडूंनी रवी राणांना केलेल्या आरोपांबाबत 1 नोव्हेंबर पर्यंत पुरावे सादर करण्यास सांगितले होते. मात्र रवी राणा यांनी त्याआधी बच्चू कडू यांची जाहीर माफी मागितली. त्यानंतर आज देखील जाहीर मेळाव्यातून बच्चू कडू यांना माफी केली असून यापुढे हा वाद मिटला असल्याचं त्यांनी जाहीर करून टाकलं.
“तारीख पे तारीख.. अजून किती?” शिंदे-ठाकरेंची सुनावणी पुन्हा लांबणीवर
आज झालेल्या जाहीर मेळाव्यातून त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला ते म्हणाले की, प्रहार काही आंडूपांडूचा पक्ष नाही. प्रहारमध्ये दहा वार करण्याची ताकद आहे. तो बाजी आहे. तानाजी आहे. वार करण्याची क्षमता आमच्यात आहे. मैदानात असेल मैदानात, तलवारीत आले तर तलवारीत आणि सेवेत आले तर सेवेत आम्ही लढल्याशिवाय राहणार नाही. आम्ही कुणाच्या वाट्याला जात नाही आणि गेलं तर कोथळा काढल्याशिवाय राहत नाही. विनाकारण तोंड मारू नका. सत्ता गेली चुलीत. आम्हाला काही पर्वा नाही.
“आम्ही बंड केल्यामुळेच सुषमा ताईंची महाराष्ट्रात ओळख झाली”; शिंदे गटाच्या आमदाराचं वक्तव्य
दरम्यान, नाव जरी बच्चू असेल आणि आ़डनाव जरी कडू असलं तरी त्यात सुगर नाही. काहीही खाल्लं तर त्याच्यासोबत कडू आहे. निर्णय कडू आहेत. पण आमचं काम गोड आहे. आज कोणत्या पक्षात बंडखोर नाहीत. प्रत्येक पक्षात बंडखोर आहेत. त्यामुळे आमच्या वाटेला जालं तर कोथळा बाहेर काढू. तसेच आमचा पक्ष जरी लहान असला तरी दिलदार आहे. असंही ते म्हणाले.
Read also
- “प्रहार काही आंडूपांडूचा पक्ष नाही, प्रहारमध्ये दहा वार करण्याची ताकद”; बच्चू कडू
- “सत्ता चुलीत गेली, आम्ही जनसामान्यांसाठी सरकारला पाठींबा दिला”; बच्चू कडूंचा एल्गार प्रहार
- “हम तो वो बदनाम है की बदनामी हमसे डरती है”; गुलाबराव पाटलांची शायरी
- “तुम्ही तिकडून राजीनामा द्या, मी सिल्लोडमधून देतो, बघू मग काय होतं ते”; सत्तारांचं आदित्य ठाकरेंना आव्हान
- पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प ठरवणार शिरुर लोकसभेतील भाजपाचा उमेदवार !