मुंबई – भीमा-कोरेगावमध्ये जे साहित्य मिळाले त्यात चीन, आयएसआय, कशी मदत करत होते हे पोलिसांनी सिद्ध करून अशा डाव्या विषवल्लीचा बुरखा टराटरा फाडला आहे. त्याचप्रमाणे राहुल गांधी यांच्या ट्विटनंतर राज्यातील अमरावतीत दंगा झाला, असा गंभीर आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केला.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या या आरोपाला काँग्रेस नेते नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “भाजपाने देशासाठी काय केले. देश विकणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये”; असा खोचक टोला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
पुणे जिल्हा सहकारी बॅंक निवडणुकीसाठी अजित पवारांनी भरला उमेदवारी अर्ज
नाना पटोले म्हणाले,”अमरावती दंगलीत भाजपाचे आमदार व नेतेच सक्रीय होते, भाजपाच्या नेत्यांनीच चिथावणी देणारी विधाने केली. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर अमरावती दंगलीचे खापर फोडणे चुकीचे आहे. राहुल गांधी यांची बदनामी करण्याचा हा प्रयत्न आहे व असा प्रयत्न भाजपाकडून सातत्याने होत आहे. राहुल गांधी यांच्याविषयी बोलण्याचा फडणवीस यांना नैतिक अधिकार नाही. गांधी कुटुंबाने देशासाठी त्याग केला आहे, बलिदान दिले आहे, भाजपाने देशासाठी काय केले. देश विकणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये”
…आणि 22 दिवसांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘वर्षा’वर दाखल, रुग्णालयातून डिस्चार्ज
दरम्यान, त्रिपुरातील हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अमरावती, मालेगाव, नांदेड, औरंगाबादसह इतर काही ठिकाणी मुस्लीम संघटनांनी बंद पुकारला होता. काही ठिकाणी निदर्शनं करण्यात आली. या आंदोलनाला अमरावती, मालेगावसह काही ठिकाणी हिंसक वळण लागलं. अमरावतीमध्ये हिंसाचाराच्या सगळ्यांत जास्त घटना घडल्या. काही ठिकाणी दुकानं फोडण्यात आली तर काही ठिकाणी दगडफेक झाली. यात पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचंही वृत्त आहे. या घटनांनंतर दुसऱ्या दिवशी भाजपने अमरावतीसह काही ठिकाणी मोर्चा काढला.
Read Also :
- मुंबै बँक बिनविरोध; प्रवीण दरेकर, प्रसाद लाडांना विरोधकच नाही
- ‘पवारसाहेब फक्त निवडणुकीच्या काळातच पावसात भिजतात’; सदाभाऊ खोतांचा टोला
- आणखी एका एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू; संतप्त आंदोलकांनी मृतदेह आणला थेट बसस्थानकातच!
- किल्ले रायगडावरील होळीच्या माळावरच राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर उतरेल; संभाजीराजे यांची माहिती
- भाजप – मनसे युती होणार का?; बाळा नांदगावकरांनी केला गौप्यस्फोट