मुंबई : पालघर साधू हत्याकांड प्रकरणाबाबत आता मोठी माहिती समोर येत आहे. या हत्याकांडाचा तपास आता सीबीआयकडे सोपवण्यासाठीची अनुमती महाराष्ट्र सरकारने दाखवली आहे. तशाप्रकारचे पत्र सर्वोच्च न्यायालयात देखील दाखल करण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता भाजपने महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
“शिव्या हासाडणारे सत्तारांनी सुचवलेलं कुत्रा निशाणी घ्या”; रूपाली पाटलांचा शिंदेंना टोला
भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी याप्रकरणाबाबत उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली आहे. जे नामर्दांच्या सरकारला जमलं नाही ते हिंदुधर्मरक्षक देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं. असं म्हणत पालघर साधू हत्याकांडाची केस सीबीआयला वर्ग करून गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस आपल्या धर्माप्रती किती जागरूक आहेत हे हिंदूंना आज समजलं आहे. असंही तुषार भोसले यांनी म्हटलं आहे.
“उद्धव ठाकरे ज्यावेळी सोनिया गांधी समोर झुकले, त्याचवेळी भाजपचा कार्यकर्ता म्हणून दु:ख झालं”
16 एप्रिलच्या 2022 रात्री सुरतकडे निघालेल्या दोन साधू व त्यांच्या चालकांची गडचिंचले येथे जमावाने हत्या केली होती. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी 200 जणांना अटक केली होती. नोव्हेंबर 2022 मध्ये याप्रकरणी 55 लोकांना जामीनावर सोडून देण्यात आलं आहे. तर डिसेंबर महिन्यात 47 आरोपींना ठाणे सत्र न्यायालयाने प्रत्येकी 15 हजार जात मुचलक्यावर जामीन अर्ज मंजूर केला होता.
जे नामर्दांच्या सरकारला जमलं नाही ते ‘हिंदूधर्मरक्षक देवेंद्र फडणवीस’ यांनी करून दाखवलं! – @AcharyaBhosale (भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रमुख)
– या घटनेनंतर आचार्य भोसलेंनी सातत्याने ही केस सीबीआयकडे द्या ही मागणी केली होती आणि ठाकरे सरकारविरोधात मंत्रालयासमोर आंदोलन देखील केले होते pic.twitter.com/nK6EPIJc1o
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) October 11, 2022
Read also
- “पहा झोपड्या कंगालांच्या थरथरल्या भवताली, अन्यायाला जाळीत..;” सुषमा अंधारे
- शिंदे गट ‘रिक्षा’ चिन्हासाठी आग्रही..! शिंदेंनी आयोगाला पाठवले दोन मेल
- “नाव, नेता अन् चिन्ह पाहणाऱ्या कॉपी बहाद्दर लोकांनो..”; अंबादास दानवेंनी शिंदेंना फटकारलं
- “धनुष्यबाण गोठवण्याचा नीचपणा केला, त्यांचा राजकीय अंत शिवसेनेच्या बाणानेच होणार”
- जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका तत्काळ घ्या…! जिल्हा परिषद सदस्य असोसिएशनची मागणी