मुंबई : निवडणुक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याने शिंदे गटावर प्रखर शब्दात टिका केली जात आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून शिंदेंवर जोरदार टिकास्त्र सोडलं जात आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून शिंदे गट देखील जोरदार हल्लाबोल करीत आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यातच आज सामानातून शिंदे गटावर प्रहार करण्यात आला आहे.
“उद्धवजी तुम्ही लढा..आम्ही आहोत तुमच्यासोबत”; काॅंग्रेसचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा
भाजपने शिवसेनेच्या बाबतीत त्यांची नीच खेळी केली. आता पुढे काय? सत्तेचा गैरवापर, पैशांचा मस्तवाल वापर करून तुम्ही जे केलेत ते शेवटचे टोक. त्या टोकावर आज शिवसेना आहे व भरारी घेण्यासाठी संपुर्ण आकाश मोकळे आहे. जणू शिवसेनेचा पुनर्जन्मच होताना आम्ही पाहत आहोत. शिवसेना ही काही तुमच्या खोकेवाल्यांसारखी विकाऊ संघटना नाही. असं देखील सामानातून म्हटलं आहे. स्वाभिमानाच्या मजबुत पायावर ती 56 वर्षापासून न डगमगता उभी आहे. अनेक वादळे आणि घाव झेलून तिने झंझावात कायम ठेवला आहे. शिवसेना संपवू अशी स्वप्ने पाहणाऱ्यांच्या गोवऱ्या सोनापुरात रचून शिवसेनेने अनेक अग्निपरिक्षा पार केल्या आहेत.
“नावात काय आहे ? शिवसेना हे नाव जरी गोठवलं तरी..;” संजय राऊतांचं स्पिरीट
शिवसेना हा एक चमत्कार आहे. इश्वरी अवताराचा अंश आहे. भगवान शंकाराने हलाहल प्राशन करताना एक थेंब पृथ्वीवर पडला. त्या थेंबातूनच जणू शिवसेनेचा अग्नी प्रकट झाला. त्यामुळेच सर्व प्रकारचे हलाहल पचवून शिवसेना खंबीरपणे उभी आहे. ज्यांनी शिवसेना आणि धनुष्यबाण गोठवण्याचा नीचपणा केला त्यांचा राजकीय अंत शिवसेनेच्या बाणानेच होणार आहे. असे अनेक शिंदे व मिंधे येत जात असतात. गद्दारांना इतिहासात कधीच स्थान नसते. पोवाडे मर्दांचे व स्वाभिमान्यांचे गायले जातात. खोकेबाज मिंध्यांवर लोक थुंकतात. अशी टिका देखील करण्यात आली आहे.
“कारसेवकांवर गोळ्या झाडणारे मुलायम सिंह यादव”; भाजप नेत्याचं वादग्रस्त ट्विट, नागरिकांकडून संताप
मिंधे गटाचा मुखवटा म्हणजे विचार नाही. मुखवट्याचे भ्रष्ट, बेईमान गेंड्यांची कातडी आहे. महाराष्ट्रीय जनतेने खोक्यांच्या चिता पेटविल्या की गेंड्याची कातडीही जळून जाईल. छे..छे यांना जाळायचे कसे? ही तर अफझल खान, औरंग्यांच्या विचांराची अवलाद. महाराष्ट्राच्या दुष्मनांचे दफन करायला हवे. त्यांच्या थडग्यांवर फक्त एवढेच लिहायचे. येथे महाराष्ट्राच्या गद्दारांना स्वाभिमानी मराठी जनतेने कायमचे गाडले आहे.. त्या थडग्यावर तुमची नातवंडेही थुंकतील. हे राज्य श्रींचे आहे. शिवरायांचे आहे. शिवसेना शिवरायांचा अंश आहे. तो अंश तुम्ही कसा मिटवणार? असा खोचक सवाल देखील सामानातून करण्यात आला आहे.
Read also
- जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका तत्काळ घ्या…! जिल्हा परिषद सदस्य असोसिएशनची मागणी
- “शिव्या हासाडणारे सत्तारांनी सुचवलेलं कुत्रा निशाणी घ्या”; रूपाली पाटलांचा शिंदेंना टोला
- “उद्धव ठाकरे ज्यावेळी सोनिया गांधी समोर झुकले, त्याचवेळी भाजपचा कार्यकर्ता म्हणून दु:ख झालं”
- “हनुमान चालिसेला विरोध केल्यामुळे प्रभु श्रीरामाने ‘धनुष्यबाण’ हिसकावलं”
- “बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हॅक झाल्याने मला अतिव दु:ख”; सुधीर मुनगंटीवार