पुणे : राज्यात काल 608 ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर कऱण्यात आला आहे. या निकालामध्ये सार्वधिक ग्रामपंचायतींवर भाजपने वचर्स्व मिळवलं असून दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काॅंग्रेस आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला या निवडणुक मोठं यश आलं असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सर्वात कमी ग्रामपंचायतींवर वचर्स्व मिळवता आलं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांवर आर्थिक संक्रात..! रूपाली पाटील म्हणाल्या, “कुठे आहे रे कडकनाथा?”
ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला सर्वात जास्त म्हणजे 258 ग्रामपंचायतींवर यश मिळालं आहे. तर तिकडे भाजप आणि शिंदे गटाला 228 ठिकाणी यश मिळालं आहे. पुण्यात राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. तर नागपुर, विदर्भात भाजपची जादू चालली आहे. तर मराठवाड्यात काही ठिकाणी शिंदे गटाला मोठं यश आलं आहे. पुण्यात सर्वात जास्त जागा राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत. यातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अलिकडेच बारामतीचा दौरा केला होता. त्यावरून रूपाली पाटलांनी त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
“बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूनंतर मला संपवण्याचा कार्यक्रम उद्धव ठाकरेंनी हाती घेतला”; रामदास कदम
ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी राज्यात नंबर 1 राहिली आहे. त्यामुळे आता भाजपने 2024 ला मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून भाजपने चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव जाहीर केलं. तावातावाने त्यांनी पुण्याचा व बारामतीचा दौरा केला आणि पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीत बावनकुळे यांच्या नेतृत्वात भाजपला भोपळा फोडता आला नाही. असं रूपाली पाटलांनी सुनावलं आहे.
‘अभी तो असली मंजिल पाना बाकी है, अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है,
बावनकुळे यांचा एकप्रकारे पुणेरी पाणउतारा लोकांनी मतातून केला, पण बावनकुळे थांबणार नाहीत बारामतीत लढवून डिपॉजिट जप्त होईपर्यंत त्यांचा लढा चालू राहिल. तिघाडी सरकारचा पुण्यात सुफडा साफ झाला. तीन तिघाडा, काम बिघाडा असं म्हणत त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्याचबरोबर कोणतीही निवडणुक होऊ दे, मग ती ग्रामपंचायत असो किंवा मुंबई महापालिका झेंडा हा भडकणारच भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा असं वक्तव्य कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
Read also
- राऊतांचा खासदार म्हणून महिन्याला 1 लाख 85 हजार अन् सामनात 1 लाख पगार..! इडीने जाहीर केलं राऊतांचं आरोपपत्र
- “दसरा मेळाव्याची स्क्रिप्ट बारामतीवरून येणार, अबु आझमी व ओवेसी स्टेजवर असणार का?” मनसेचा खोचक सवाल
- “आज रामदास कदमांचं खरं रूप समोर आलं, उद्या सगळ्याच बंडखोर आमदारांचं रूप समोर येईल”
- “राहुल गांधींनाच काॅंग्रेसचा अध्यक्ष बनवा”; महाराष्ट्र काँग्रेसच्या बैठकीत ठराव मंजूर
- “शिवाजी पार्क सील केलं तर ते तोडून टाकू;” परवानगी नाकारल्याने चंद्रकांत खैरे आक्रमक