पुणे : कल्याणीनगर भागात झालेल्या अपघात प्रकरणातील कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांकडून निष्काळजीपणा झाल्याची कबुली स्वत: पोलिस आयुक्तांनीच दिली आहे. काल पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व घटनाक्रम नमुद केला. यातच येरवडा पोलिस ठाण्यातील पोलिस निरिक्षक आणि सहायक पोलिस निरिक्षक या दोघांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. रात्री उशिरा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी हे आदेश दिले आहेत.
हेही वाचा…लोकसभेनंतर विधानपरिषदेच्या ४ जागांसाठी निवडणुकांची घोषणा, नवीन वेळापत्रक जाहीर
पोलिस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहायक पोलिस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी अशी या निलंबित करण्यात आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांची नावे असून शुक्रवारी रात्री यासंदर्भात पोलिस आयुक्तांनी आदेश दिले आहेत. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्राथमिक चौकशीअंत अपघाताची माहिती वरिष्ठांकडून अपघाताची माहिती वरिष्ठांपासून लपवणे आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
हेही वाचा…“गृहमंत्री महोदय, गाडीखाली कुत्रं नाही तर जीवंत माणसं चिरडली जातायेत”
दरम्यान, या प्रकरणाची माहिती पोलिस नियंत्रण कक्ष आणि यांनाही अपघाताची माहिती दिली नाही. त्यांच्या या कृत्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि तपासाव र संक्षय निर्माण झाला होता, म्हणून ही निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“गृहमंत्री महोदय, आता तरी जागे व्हा”, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना जोरदार टोला
हेही वाचा..विशाल अग्रवालला कोर्टाचा मोठा दणका, कोर्टात आज नेमकं काय काय घडलं ?
हेही वाचा..राज्यात पाण्याची भीषण टंचाई, शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ‘या’ मागण्या