मुंबई : काही वर्षभरापूर्वी अनंत करमुसे या तरूणाने समाज माध्यमावर एक पोस्ट केली होती, ज्याचा राग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधले गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना येऊन, त्यांच्या सांगण्यावरून काही कार्यकर्त्यांनी, आपल्याला आव्हाडांच्या ठाणेच्या बंगल्यावर नेऊन मारहाण केल्याचा आरोप अनंत करमुसे यांनी केला होता.
दरम्यान, या प्रकरणाची आता उच्च न्यायालयात सुनावणी सुरु असून, या प्रकरणातील वकिलाच्या फी मुळे आघाडी सरकार अडचणीत सापडण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण, सामान्य मााणसाला बेदम मारहाण करणाऱ्या या कॅबिनेट मंत्र्याला न्यायालयात वाचवण्याकरता ठाकरे सरकार, प्रतिदिन सुनावणीसाठी वकिलाला अडीच लाख रुपये फी देऊ करणार आहे, यावरू भाजपने आवाज उठवला असून, भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी ट्विट करून महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
सामान्य मााणसाला मारहाण करणाऱ्या कॅबिनेट मंत्र्याला वाचविण्यासाठी महाविकास आघाडी सरकार उच्च न्यायालयात प्रतिदिन सुनावणीसाठी वकिलाला दररोज अडीच लाख रुपये देणार आहे. तर कोविड आपत्तीत सेवा पुरविणाऱ्या व्यावसायिकांना पैसे दिले जात नाहीत. अशा परिस्थितीत राज्य सरकार कोणाचे हित जपत आहे? pic.twitter.com/oxBWAc9aWu
— Niranjan Davkhare (@niranjandtweets) May 13, 2021
“सामान्य मााणसाला मारहाण करणाऱ्या कॅबिनेट मंत्र्याला वाचविण्यासाठी महाविकास आघाडी सरकार उच्च न्यायालयात प्रतिदिन सुनावणीसाठी वकिलाला दररोज अडीच लाख रुपये देणार आहे. तर कोविड आपत्तीत सेवा पुरविणाऱ्या व्यावसायिकांना पैसे दिले जात नाहीत. अशा परिस्थितीत राज्य सरकार कोणाचे हित जपत आहे?”, असा सवाल त्यांनी ठाकरे सरकाराला केला आहे.
Read Also :
- सामान्य माणसा “तूच तुझा सांगाती”, वसुली सरकारवर विसावला त्याचा कार्यभाग बुडाला
- अखेर लॉकडाऊनमध्ये वाढ, जारी केली नवी मार्गदर्शक तत्वे
- अजित पवारांनी रद्द केला आपल्याच सरकारचा “उधळपट्टी”चा निर्णय
- मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना केवळ PR महत्वाचा, राज्यातल्या जनतेचा जीव मात्र कवडीमोल
- ‘स्वतःच्या कौतुकाची टिमकी वाजवणाऱ्या ठाकरे सरकारचे न्यायालयानेच वाभाडे काढले’