मुंबई : राज्य सरकारने महामारीची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत १५ मे पर्यंत लॉकडाऊनसोबतच कडक निर्बंध लागू केले होते. मात्र, राज्यातल्या सक्रिय रुग्णांची संख्या कमी येत असली, तरी राज्यातील काही जिल्ह्यात, तसेच ग्रामीण भागात रुग्णवाढ होत असल्याने, राज्यातील लॉकडाऊन ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत लागू करण्यात आलेल्या निर्बंधांसकट वाढवून १ जून सकाळी ७ वाजेपर्यंत ठेवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला असून, याबद्दलची नियामवली आज जाहीर करण्यात आली आहे.
नवीन नियमावली…
- दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांना मुभा.
- घरपोच सेवा विक्री साठी परवानगी कायम.
- इतर राज्यातून राज्यात येण्याऱ्याला ४८ तास आधी आरटीपीसीआरटी टेस्ट गरजेची.
- परराज्यातून माल वाहतूक करणाऱ्या गाड्यांमध्ये २ जणांना मुभा असेल. (आरटीपीसीआर टेस्ट गरजेची)
- भाजीपाला, किराणा घरपोच मिळणार.
- बाजार समितीत प्रतिबंधात्मक नियम पाळणे निकडीचे.
- गर्दीच्या ठिकाणांवर प्रशासनाची नजर.
- नियमांचं पालन होत नसेल त्या ठिकाणी, तसेच परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल तिथे, स्थानिक प्रशासनाला निर्बंध वाढवण्याचा किंवा बंद करण्याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य.
- महामारीशी संबंधित आणि इतर औषधं तसेच महामारीशी संबंधित साहित्यसामग्रीसाठी प्रवास करावा लागणाऱ्या विमानतळ आणि बंदरावरील कर्मचाऱ्यांना लोकल, मोनो आणि मेट्रोने प्रवास करण्याची मुभा.
🚨Strict restrictions under #BreakTheChain extended till 1st June 2021🚨 pic.twitter.com/QxEmW77ZlV
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 13, 2021
दरम्यान, कालच्या पत्रकार परिषदेत आरोग्यमंत्र्यांनी, १८ ते ४४ वयोगटातलं लसीकरण थांबवण्यात यावं अशी चर्चाही बैठकीत झाली असल्याचं सांगितलं असून, राज्यात लसींचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने, या वयोगटातील नागरिकांचं लसीकरण सध्या स्थगित करण्यात येणार असल्याची चर्चा बैठकीत झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
Read Also :
- अजित पवारांनी रद्द केला आपल्याच सरकारचा “उधळपट्टी”चा निर्णय
- मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना केवळ PR महत्वाचा, राज्यातल्या जनतेचा जीव मात्र कवडीमोल
- ‘ठाकरे सरकारचा अनलॉकबाबत ठोस ‘एक्झिट प्लॅन’ काय?’
- ‘स्वतःच्या कौतुकाची टिमकी वाजवणाऱ्या ठाकरे सरकारचे न्यायालयानेच वाभाडे काढले’
- ‘पटोले हे विनोदी कलावंत, त्यांना गांभीर्याने घ्यायचे कारण नाही’