मुंबई : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी, राज्यातला लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवण्याबद्दल चर्चा झाली असल्याचं,काल पत्रकार परिषदेबद्दल बोलताना सांगितलं. तसेच याबाबत मुख्यमंत्री लवकरच निर्णय जाहीर करतील असंही ते बोलले. त्यानंतर आज महाविकास आघाडी सरकारने राज्यातला लॉकडाऊन १ जून पर्यंत वाढवला असल्याचं जाहीर केलं आहे. त्याचसोबत काही नवीन मार्गदर्शक सूचना देखील जारी केल्या आहेत.
दरम्यान, यावरून विरोधी पक्षाने ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला असून, भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर ट्विट करून निशाणा साधला आहे. “मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली आहे, साहेबांना बारमालकांची काळजी, तू तुझ्या कुटुंबाची जबाबदारी घे. वसुली सरकारवर विसंबून राहण्यात अर्थ नाहीत वसुली सरकारला पोलिसात वाजे तर लस द्यायला फरहान अख्तर लाडका आहे, सामान्य माणसा तुच तुझा वाली”, असं लिहीत त्यांनी जोरदार टीका केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली आहे, @PawarSpeaks साहेबांना बारमालकांची काळजी, तू तुझ्या कुटुंबाची जबाबदारी घे. वसुली सरकारवर विसंबून राहण्यात अर्थ नाहीत वसुली सरकार मध्ये पोलिसात वाजे तर लस द्यायला @FarOutAkhtar लाडका आहे, सामान्य माणसा तुच तुझा वाली
— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 13, 2021
तसेच, “लॉकडाऊन पुन्हा वाढला. मुख्यमंत्री स्वतः म्हणालेच होते, “माझे कुटुंब, माझी जबाबदारी!”… सामान्यमाणसा, नोकरदारा, बलुतेदारा, नोकरदारा, कष्टकरी मजुरा, तूच आहेस तुझा रक्षणकर्ता. मायबाप राज्य सरकारने तुला नव्या लाटेत वाऱ्यावर सोडले आहे. तुझा EMI, तुझ घरखर्च, तुझ लाईटबिल तुच पहा..”, असा शाब्दिक हल्ला केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर केला आहे.
राज्य सरकारने महामारीची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत १५ मे पर्यंत लॉकडाऊनसोबतच कडक निर्बंध लागू केले होते. मात्र, राज्यातल्या सक्रिय रुग्णांची संख्या कमी येत असली, तरी राज्यातील काही जिल्ह्यात, तसेच ग्रामीण भागात रुग्णवाढ होत असल्याने, राज्यातील लॉकडाऊन ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत लागू करण्यात आलेल्या निर्बंधांसकट वाढवून १ जून सकाळी ७ वाजेपर्यंत ठेवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
Read Also :
- अखेर लॉकडाऊनमध्ये वाढ, जारी केली नवी मार्गदर्शक तत्वे
- अजित पवारांनी रद्द केला आपल्याच सरकारचा “उधळपट्टी”चा निर्णय
- मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना केवळ PR महत्वाचा, राज्यातल्या जनतेचा जीव मात्र कवडीमोल
- दारूवाल्यांसाठी लिहिलं, १५० लाख शेतकऱ्यांसाठीसुद्धा पवार साहेब मुख्यमंत्र्यांना पत्र लिहाना!
- काम झटकायचं आणि मंत्रिपद टिकवायचं, हेच आघाडी सरकारमधल्या मंत्र्यांचं काम