मुंबई : महामारीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या हॉटेल-बारचालक आणि आदरातिथ्य क्षेत्रातील व्यावसायिकांच्या समस्यांचे आणि प्रश्नांचे निराकरण करून देण्याच्या उद्देशाने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आणि बार-हॉटेल-रेस्टोरंट व्यावसायिकांच्या मदतीची मागणी केली.
दरम्यान, यानंतर भाजपकडून त्यांच्यावर पत्रवार सुरु असून, खासदार रक्षा खडसे यांच्यानंतर आता माजी कृषिमंत्री अनिल बोन्डे यांनी देखील पवारांना पत्र लिहिले आहे.
मा. शरदचंद्रजी पवार साहेब शेतकरी, शेतमजुरांच्यासाठीही मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहाना….#आक्रोश_शेतकऱ्यांचा @PawarSpeaks @BJP4Maharashtra pic.twitter.com/3KoVPTxMwB
— Dr. Anil Bonde (@DoctorAnilBonde) May 11, 2021
“पवार साहेब मुख्यमंत्री फक्त आपलच ऐकतात. तुम्ही दारूवाल्यांसाठी कळकळीने पत्र लिहिलं. त्यांचे आशीर्वाद तर तुम्हाला मिळतीलच, नाही नाही दारूवाल्यांच्या आशिर्वादांवरच तुमची मदार असेल, पण राज्यातील १५० लाख शेतकऱ्यांची कुटुंबे अडचणीत असून, ते आशेने सरकारकडे बघत आहेत. त्यांनासुद्धा जगण्यासाठी सरकारच्या मदतीची आवश्यकता आहे. या सर्वांसाठी पवार साहेब मुख्यमंत्र्यांना पत्र लिहाना! “, असं आर्जव त्यांनी केलं आहे. याचसोबत त्यांनी;
- “गावखेड्यातील बारा बलुतेदार आर्थिक संकटात आहेत. स्वतःचं कुटुंब पोसण्याचा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. त्यात मायबाप सरकार लॉकडाऊन वाढवणार. त्यांना केंद्राकडून मदत मिळाली, मात्र ठाकरे सरकारने एकही दमडी बँक खात्यात टाकली नाही.
- काही काळासाठी तरी शेतकऱ्यांना विक्री करण्याची सवलत देण्यासाठी
- अवकाळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी
- शेतकऱ्यांना हक्काचा पीक विमा मिळण्यासाठी
- शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि बँकेतून नवीन कर्ज देण्यासाठी
- कृषी पंपांचे वीजबिल माफ करण्यासाठी
- महामारीकाळातील शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे आणि गोरगरिबांचे वीजबिल माफ करण्यासाठी
- सर्व दुःखितांच्या पीडितांच्या मदतीसाठी…
आणि शेतकरी आणि शेतकऱ्यांसाठी पवार साहेब मुख्यमंत्र्यांना पत्र लिहाना!
अश्या प्रकारच्या मागण्यांची यादीच माजी कृषिमंत्री यांनी पत्राच्या माध्यमातून शरद पवार यांना केली आहे. त्यामुळे खरच जसे पत्र हॉटेल-बारचालक आणि आदरातिथ्य क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी लिहिले, तसे राज्यातल्या शेतकरी, शेतमजूर आणि गोरगरिबांसाठी शरद पवार लिहिणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
Read Also :
- लॉकडाऊन वाढवला, लसीकरण स्थगित; ठाकरे सरकारचा निर्णय
- बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार वादग्रस्त वक्तव्याने पुन्हा चर्चेत, म्हणाले…
- काम झटकायचं आणि मंत्रिपद टिकवायचं, हेच आघाडी सरकारमधल्या मंत्र्यांचं काम
- रक्षा खडसेंचे शरद पवारांना पत्र, करून दिली जुन्या वादयाची आठवण
- पत्रकार, कॅमेरामन यांना तात्काळ फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करा – देवेंद्र फडणवीस