मुंबई : गेल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावरील जिल्ह्यांना तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसून फळबागांचे, मच्छीमारांच्या बोटींचे, अनेक घरांचे आणि इमारतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळ नुकसानग्रस्तांप्रमाणेच मदत दिली जाईल, अशी महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २१ मे ला कोकण दौरा करून, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना भेटी दिल्या. तसेच चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. त्यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी, ‘कुणालाही मदतीपासून दूर ठेवले जाणार नाही. राज्य सरकारकडून प्रत्येक नुकसानग्रस्तांना योग्य आणि वेळेवर मदत मिळेल,’ असे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे आज त्यांच्या ट्विटर हँडलवरून ही मदतीची घोषणा करण्यात आली आहे.
तोक्ते चक्रीवादळग्रस्तांना नुकसानभरपाई देणार अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केली आहे. २१ मे रोजी त्यांनी कोकण दौरा करून नुकसानीचा आढावा घेतला होता. कुणालाही वंचित ठेवणार नाही आणि व्यवस्थित मदत केली जाईल असे आश्वस्त केल्याप्रमाणे त्यांनी आज ही घोषणा केली.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 25, 2021
दुसरीकडे, तौक्ते चक्रीवादळानंतर कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि जीवित नुकसान झाले असून, याचा सर्वात जास्त तडाखा हा राज्यातल्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना आणि लगतच्या परिसराला बसला आहे. तसेच, वादळामुळे राज्यात आत्तापर्यंत १९ जणांचे जीव गेले आहेत.
Read Also :
- मराठा आरक्षण : विनायक मेटेंनी ठाकरे सरकारला खेचले न्यायालयात
- ‘गृहविलगीकरणास बंदी’ निर्णयाचा फेरविचार करावा : आमदार महेश लांडगे
- “रीनैसंस द स्टेट” पुस्तकावर राज्यात आणि देशभरात बंदी घालावी, संभाजीराजेंकडून गिरीश कुबेर यांचा जाहीर निषेध
- त्यांनी कोविड सेंटरमध्ये नर्तकांना नाचवले तरी देखील चालते; मात्र आम्ही कोविड सेंटरमध्ये यज्ञ केल्याने आमच्या विरोधात तक्रार
- ‘मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भेटू पाहणाऱ्या संभाजीराजेंसाठी वेळ नाही, पण अभिनेत्रींना भेटायला वेळ आहे’