मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत असून, यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. या मुद्द्यावरुन एकीकडॆ शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनी १ ते ५ जून दरम्यान राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली असून, दुसरीकडे छत्रपती संभाजीराजे यांनीदेखील मराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाजाची बाजू ऐकून घेण्यासाठी आणि अभ्यासासाठी महाराष्ट्र दौरा आयोजित केला आहे, तर तिसरीकडे राज्यातील राजकीय पक्षांमध्ये यावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.
दरम्यान, आज या मुद्द्यावरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या काल झालेल्या पत्रकार परिषदेतील एका विधानाचा संदर्भ घेऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
काल चंद्र्कांत दादांनी पत्रकार परिषदेत, “मराठा आरक्षण हा मुद्दा राज्याचा आहे, म्हणून पंतप्रधानांनी संभाजीराजेंना भेटायला वेळ देऊ केली नाही,” असं सांगितलं होतं. पाटलांच्या याच मुद्द्यावर नेमके बोट ठेऊन सचिन सावंत यांनी ट्विट करून, “चंद्रकांत दादा, प्रियांका चोप्रा व कंगनाला वेळ देणाऱ्या मोदींना छत्रपती संभाजी राजेंना भेटायला वेळ नाही. राजे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भेटू पाहत होते. या अभिनेत्री कोणते प्रश्न घेऊन भेटल्या? कोणास भेटावे हा आक्षेप नाही. संभाजीराजेंना भेट न देणे महाराष्ट्राचा अवमान मात्र आहे,” असा सवाल केला आहे.
महाराष्ट्रातील बॉलिवूड बद्दल मोदींना अधिक माहिती आहे. पण मराठा आरक्षणाबाबत त्यांना माहिती नाही हे चंद्रकांत पाटील यांचे म्हणणे मराठा आरक्षणासाठी ५८ मोर्चे काढून इतिहास रचणा-या आंदोलकांच्या जखमांवर मीठ चोळणारे आहे. pic.twitter.com/L9I3AC664C
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 25, 2021
तसेच, “महाराष्ट्रातील बॉलिवूड बद्दल मोदींना अधिक माहिती आहे. पण मराठा आरक्षणाबाबत त्यांना माहिती नाही हे चंद्रकांत पाटील यांचे म्हणणे मराठा आरक्षणासाठी ५८ मोर्चे काढून इतिहास रचणा-या आंदोलकांच्या जखमांवर मीठ चोळणारे आहे,” अशी टीका देखील त्यांनी ट्विटद्वारे पंतप्रधानांवर केली आहे.
Read Also :
- औरंगाबादच्या लॉकडाऊनवरून AIMIM आणि शिवसेना आमने-सामने
- रेड झोनमधील जिल्ह्यामंध्ये होम क्वारंटाईन बंद! ठाकरे सरकारचा मोठा निर्णय!
- “भाजपने एक डाव भुताचा टाकला तर तुम्हाला महागात पडेल”
- ‘लॉकडाऊन ४ टप्प्यात उठवणार, मात्र निर्बंध पूर्णपणे उठवले जातील या भ्रमात राहू नका’
- ‘मोहन भागवतांनी मौनव्रत सोडावे; राम मंदिराइतकाच, गंगेतील प्रेतांचा मुद्दा महत्वाचा’