मुंबई : देशात सध्या महामारीने थैमान घातले असून, स्मशानभूमीत देखील प्रेतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी वाट पाहावी लागत आहे. यातच, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांच्या सीमेवरील गावांतल्या नागरिकांना, गंगेतून काही बेवारस प्रेतं वाहताना दिसली. याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली.
यानंतर, गंगेच्या किनाऱ्यावर वाळूमध्ये देखील अगणित प्रेतं पुरली जात असल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर, या सर्व प्रकरणावरून उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकारवर देशभरातून टीका करण्यात आली.
दरम्यान, याच मुद्द्यावरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी रा.स्व.सं. चे सरसंघचालक मोहन भागवत यांना आपले मौन सोडण्याची विनंती केली आहे. आज सकाळी प्रसार माध्यांशी बोलताना, “गंगेत प्रेतांच्या राशी आढळून आल्या आहेत. यावर सरसंघचालक मोहन भागवत यांनी आता तरी भाष्य करावं. गंगा नदीत प्रेतं सापडली. हाही हिंदुत्वाचाच मुद्दा आहे आणि तोही राम मंदिरा इतकाच महत्त्वाचा आहे,” अशा शब्दांत त्यांनी ही विनंती केली आहे.
तसेच, “मोहन भागवत हे आदरणीय आहेत. त्यांनी या मुद्द्यांवर परखडपणे आपलं मत व्यक्त करावं. त्यांच्या मताला देशात आजही महत्त्व आहे. गंगेच्या पाण्यातून हजारो प्रेतं वाहून आली. त्यांच्यावर धार्मिक परंपरेनुसार योग्य ते अंत्यसंस्कार झाले नाहीत. त्यामुळे देशातील हिंदुत्ववादी नेत्यांनी यावर आपली भूमिका मांडणं गरजेचं आहे. त्यामुळे मोहन भागवत यांनीही यावर भाष्य केलं पाहिजे,” असं आवाहन त्यांनी केलं आहे.
Read Also :
- शिवसेनेचा नेता देवेंद्र फडणवीसांना भेटण्यासाठी तडफडत होता; उदय सामंत म्हणतात….
- उजनी पाणी प्रश्न : ‘५ टीएमसी पाण्यासाठी आता पुढचे आंदोलन थेट गोविंदबागेत’
- ‘…तर आम्ही पेढे वाटपाचा कार्यक्रम करू’, संजय राऊतांचा राज्यपालांना टोला
- मराठ्यांपाठोपाठ धनगर समाजही आक्रमक; आरक्षणासाठी ३१ मे’ला जागर करणार
- देवेद्र फडणवीस आणि उदय सामंत यांच्यात राजकीय गुफ्तगू; निलेश राणेंचा गौप्यस्फोट