मुंबई : गेल्यावर्षीच्या ६ नोव्हेंबरला राज्य सरकारने विधानपरिषदेसाठी राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नावाची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केली होती. मात्र, यावर अद्यापही राज्यपालांकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही, त्यामुळे मधले काही काळ राज्यपाल आणि ठाकरे सरकार यांच्यात तणावाचे संबंध निर्माण झाले होते.
दरम्यान, या विषयाला आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा हात घातला असून, कालच्या ‘सामना’च्या अग्रलेखातून त्यांनी राज्यपालांवर टीका केली होती. तसेच, यांनतर सत्ताधारी आघाडी सरकारमधील इतर घटक पक्षातल्या नेत्यांनी देखील यावरून राज्यपालांवर निशाणा साधला.
यातच आज पुन्हा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली असून, “राज्यपालांनी त्यांच्या पदाला शोभेल असं काम केलं पाहिजे,” असा सल्ला त्यांनी राज्यपालांना दिला आहे. तसेच, “त्यांच्याकडून विधानपरिषदेतील १२ आमदारांच्या फाईलवर सही झाली की आम्ही पेढे वाटू,” असा गोड टोला देखील त्यांनी राज्यपालांना लगावला आहे.
“आम्ही दिलेली ती फाईल कोणत्याही भुताने पळवली नसून, ती राजभवनातच आहे, हे स्फटिकासारखं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता राज्यपालांनी त्यावर सही करावी. ही काही बोफोर्स, राफेल किंवा कोणत्याही ठेकेदाराची फाईल आहे का?, राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यानी एकमताने मंजूर केलेल्या आमदारांची त्यात नावे आहेत. अशा महत्वाच्या फाईलवर ६-७ महिने निर्णय होत नाही?, राज्यपाल म्हणजे राज्याचे प्रमुख. त्यामुळे त्यांनी या गोष्टीचं भान ठेवावं,” असे बोल त्यांनी राज्यपालांना लावले आहेत.
Read Also :
- मराठ्यांपाठोपाठ धनगर समाजही आक्रमक; आरक्षणासाठी ३१ मे’ला जागर करणार
- देवेद्र फडणवीस आणि उदय सामंत यांच्यात राजकीय गुफ्तगू; निलेश राणेंचा गौप्यस्फोट
- ‘संजय राऊतांना काही कामधंदा नाही’
- ‘… म्हणून पंतप्रधान मोदींची आजपर्यंत संभाजीराजेंशी भेट होऊ शकली नाही’
- ‘राहुल गांधींना ‘पंतप्रधानपदी’ पाहणे म्हणजे मोदींना ‘पंतप्रधान’ म्हणून कायम ठेवण्याचा प्रयत्न’