मुंबई : राज्यात ओबीसी समाजातील विविध घटकांना न्याय देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१६ च्या शासनाच्या आदेशान्वये स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन केले होते. चार हजार कोटींच्या विविध योजना राबविणाऱ्या या मंत्रालयात ओबीसी विभाग स्थापन होऊन आठ वर्ष झाली आहेत. किमान ५०० कर्मचाऱ्यांची गरज असताना सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी ओबीसी कल्याण विभागात ३७० पदे वर्ग करण्याच्या शासन निर्णायाला केराची टोपली दाखवल्याने फक्त पाचच अधिकारी हे मंत्रालय हाकत असल्याने राज्याचे विरोधी पक्षाचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टिका केली आहे.
हेही वाचा…नेत्यांना मराठा समाजाकडून गावबंदी, शिंदेंच्या ‘या’ मंत्र्यांना गावकऱ्यांनी अक्षर:श पळवून लावलं
काम कमी आणि घोषणा जास्त हीच महायुती सरकारची काम करण्याची पद्धत आहे. राज्यात सर्वात जास्त असलेल्या ओबीसींच्या योजनांची अंमबजावणी करण्यासाठी फक्त ५ अधिकारी सरकारकडे आहे. ओबीसी समाजाच्या योजना कागदावर पण जाहिरातबाजीसाठी मात्र सरकार तत्पर असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. चार हजार कोटींचा असलेला हा विभाग , ३७० जागांच्या नियुक्तीचा आदेशाची अंमलबजावणी होत नाही.फक्त पाच अधिकारी हा विभाग चालवत आहेत, ओबीसी समाजाला असा न्याय सरकार देणार का? नुसत्या घोषणा करायच्या, आश्वासन द्यायची प्रत्यक्षात करायचं काहीच नाही हाच या दिशाहीन सरकारचा कारभार आहे. अशी टिका वडेट्टीवार यांनी केली आहे.
हेही वाचा…मराठा समाजाबद्दल वक्तव्य करणं रामदास कदमांना भोवलं, ठाकरेंच्या शिवसैनिकाने चांगलचं सुनावलं
दरम्यान,मागील काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाचं गाजत आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. त्यावरूनही विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारबाबत आक्रमक पवित्रा हाती घेतला आहे.
काम कमी, घोषणा जास्त
हीच महायुती सरकारची काम करण्याची पद्धत आहे.राज्यात सर्वात जास्त असलेल्या ओबीसींच्या योजनांची अंमबजावणी करण्यासाठी फक्त ५ अधिकारी सरकारकडे आहे.
ओबीसी समाजाच्या योजना कागदावर पण जाहिरातबाजीसाठी मात्र सरकार तत्पर असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
चार हजार… pic.twitter.com/gG0kytCDNn
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) October 23, 2023
READ ALSO :
हेही वाचा…जमीन हडपण्याच्या वादातून महिलेला केलं विवस्त्र, भाजप आमदाराच्या पत्नीवर गुन्हा दाखल, महिला आयोग कारवाई करणार?
हेही वाचा…“महाराष्ट्राचे गृहमंत्रालय झोपले आहे का ?” गुजरातच्या पोलिसांनी संभाजीनगरात ५०० कोटींचा ड्रग्जसाठा केला जप्त
हेही वाचा…फडणवीसांकडून दादांच्या खात्यावर अंकुश, अजित पवार गटाकडून १८२७.६५ कोटींचा दिला हिशोब
हेही वाचा…मोठी बातमी..! खोके सरकारची थंडी बिअर योजना! बिअरची विक्री वाढविण्यासाठी सरकारने स्थापन केली समिती
हेही वाचा…विवस्त्र महिलेचा धावतांना व्हिडीओ व्हायरल, भाजप आमदाराच्या पत्नीवर गुन्हा दाखल