छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला आरक्षणाची राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांना दिलेली मुदत उद्या संपत आहे. त्यानंतर राज्य सरकार काय भूमिका घेणार ? त्याकडे लक्ष लागून असतांना अनेक गावांमध्ये मराठा समाजाने पुढाऱ्यांना येण्यास गावबंदी घातली आहे. यातच मंत्री अब्दुल सत्तार यांनी एका गावातून अक्षर:क्ष हाकलून लावले असल्याची घटना समोर आली आहे.
हेही वाचा…वाद वाढला…! “कोकणातील एकही मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही”,नारायण राणेंनंतर शिंदे गटाच्या नेत्याचा दावा
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दूल सत्तार हे सिल्लोड तालुक्यातील बोरगाव सावरणी येथे आले होते. गावातील रहिवाशांना दसरा मेळाव्याचं निमंत्रण घेऊन त्यांनी सोबत पत्रिकाही आणल्या होत्या. सत्तार यांच्या गाड्याचा ताफा गावात येताच गावातून अब्दलू सत्तार चले जावच्या घोषणा तरूणांकडून देण्यात आल्या. यावेळी गावातील तरूणांनी हुल्लडबाजी करत अब्दूल सत्तार यांना गावातून पळवून लावलं. गावकाऱ्यांचं उग्र रूप पाहून अब्दूल सत्तार यांनी देखील काढता पाय घेतला.
हेही वाचा…“..म्हणूनच राष्ट्रवादीच्या सर्व पदाचा राजीनामा दिला”,भुजबळांचा गड गडगडला, खंदे समर्थकाने दिला राजीनामा
दरम्यान, अब्दूल सत्तार यांना गावकाऱ्यांनी पळवून लावल्याचं वेगळंच कारण समोर आलं आहे. बोरगाव सावरणी येथे काही दिवसांपूर्वी दोन मुस्लिम महिलांचा मृत्यू संशयास्पद झाला होता. याप्रकरणात सत्तार यांच्या राजकीय दबावामुळे पारदर्शक चौकशी होत नसल्याचा काही ग्रामस्थांचा आरोप असून या रागाच्या भरातून सत्तारांना गावात येण्यापासून रोखण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे. गावकऱ्यांनी याप्रकरणात पोलिसांकडे या प्रकरणाचा निष्पपणे तपास करण्याची मागणी केली होती. तसेच या प्रकरणाचं सत्य बाहेर आणण्याचीही विनंती गावकऱ्यांनी केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मराठा समाजाबद्दल वक्तव्य करणं रामदास कदमांना भोवलं, ठाकरेंच्या शिवसैनिकाने चांगलचं सुनावलं
हेही वाचा…शाब्दिक फसवाफसवी करून सरकार आंदोलकांच्या भावनांशी खेळतंय का ? २४ तासात जाहिरातीची भाषा बदलली
हेही वाचा…शिंदे गटाचा दसरा मेळावा अडचणीत..!शिंदेंना रावण दहनाचा कार्यक्रम तिथीनुसार का नकोय? मंत्र्यांकडून मंडळांवर दबाव
हेही वाचा…तेलंगणाच्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या ‘या’ दोन नेत्यांचा कस लागणार ? पक्षानी सोपवली मोठी जबाबदारी
हेही वाचा…“प्रकाश आंबेडकरांनी निवडणुकांसाठी आघाडीसोबत आले पाहिजे,” काॅंग्रेसच्या बड्या नेत्यांनी दिले युतीचे संकेत