मुंबई : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली आहे. यावर राज्यातील ओबीसी समाजाने विरोध दर्शविला असतांना केंद्रीय मंत्री नारायण राणे कोकणातील एकही मराठा ओबीसी प्रमाणपत्र घेणार नाही अस विधान केलं आहे. यातच आता शिंदे गटातील आमदार रामदास कदम यांनी देखील अशाच प्रकाराचं विधान केलं आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
हेही वाचा…“युवा संघर्ष यात्रेला यश, सरकारकडून दखल, अजितदादा तिथे असते तर..,” रोहित पवारांनी फडणवीसांना दिले प्रत्युत्तर
राज्यातील सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मनोज जरांगे पाटलांची मागणी आहे. त्याला माझा विरोध आहे. विदर्भात कुणबी आणि मराठा चालतं. परंतु कोकणात मराठा आणि कुणबी असा चालत नाही. हे मनोज जरांगे पाटलांना माहिती नाही. त्यांचा तेवढा अजून अभ्यास नाही आहे. त्यामुळे कोकणातील एकही मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही. हे मी दाव्याने सांगतो. असं रामदास कदम यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…तब्बल ३०० कार्यकर्त्यांना घेऊन भाजपच्या ‘या’ नेत्याने गाठलं मातोश्री, ठाकरेंनी शिवबंधन बांधून दिला प्रवेश
दरम्यान, कोकणातील ९६ कुळी मराठा वेगळे असून ते कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही. मनोज जरांगे पाटलांचा तितका अभ्यास नाही. असं नारायण राणे यांनी म्हटलं होतं. त्यावर ज्यांना कुणबी प्रमाणपत्र घ्यायचा नाही.त्यांनी घेऊ नये. परंतु मराठ्यांच्या आड येता कामा नये. असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलं होतं.
READ ALSO :
हेही वाचा…“..म्हणूनच राष्ट्रवादीच्या सर्व पदाचा राजीनामा दिला”,भुजबळांचा गड गडगडला, खंदे समर्थकाने दिला राजीनामा
हेही वाचा…“प्रकाश आंबेडकर जर आघाडीसोबत येत असतील तर…,”काॅंग्रेसच्या बड्या नेत्यांचं मोठं विधान
हेही वाचा…मोठी बातमी…! मराठा समाजाचे नेते विनायक मेटेंच्या पुतण्याची आ’त्म’ह’त्या’, राज्यात एकच खळबळ
हेही वाचा…“बॉम्बस्फोटच्या वेळी दाऊद भाजपचा अध्यक्ष..,” उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना दिलं जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…राज्यात नवी राजकीय समीकरणं जुळणार? प्रकाश आंबेडकरांनी घेतली शरद पवारांची भेट