मुंबई : शिवसेनेच्या बंडानंतर ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्यातील विविध पक्षातील अनेक जण मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंच्या हातून शिवबंधन बांधत आहेत. अशातच आता भाजपच्या माजी अध्यक्षांनी आपल्या ३०० कार्यकर्त्यांसह शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्याने भाजपला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…महापालिका ताब्यात घेण्यासाठी अजित पवारांनी कंबर कसली, माजी नगरसेवकांची बोलवली महत्वाची बैठक
आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दिवा भाजपचे माजी अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांनी रोहिदास मुंडे यांना शिवबंधन बांधून त्यांचं पक्षात जोरदार स्वागत केलं. त्यांच्यासह भाजपच्या तब्बल ३०० कार्यकर्त्यांनी देखील प्रवेश केला. यावेळी आता जोरदार कामाला लागा. असं ठाकरेंनी त्यांना सांगितलंय.
हेही वाचा…“अल्टिमेटम संपला पण शिंदे समितीला पुरावे भेटेना, समितीने मागितली ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत, जरांगे पाटील मोठा निर्णय घेणार ?
दरम्यान, रोहिदास मुंडे हे दिव्याच्या प्रश्नावर कायमच सत्ताधाऱ्यांच्या विरोधात राहिले आहेत. भाजपचे अध्यक्ष असतांना त्यांनी दिव्यातील शिवसेनेच्या नेत्यांना पाणी प्रश्न, अनधिकृत बांधकामे यावर चांगलेच अडचणीत आणले होते. यातच आता त्यांच्या प्रवेशाने दिव्यात ठाकरे विरूद्ध शिंदेंची शिवसेना असा संघर्ष होण्याची शक्यता आहे. दिव्यातील विविध समस्यांवरही त्यांनी आवाज उठवला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“मुंबई बरबाद व्हायला वेळ लागला, पण पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही”
हेही वाचा…” एकनाथ शिंदे गट आणि अजित दादा गटाला भाजपात विलीन करण्याची वेळ येणार”
खंदे समर्थकाने भुजबळांची साथ सोडली, एकेकाळी भाजपला निवडणुकीत दिला होता मोठा झटका
हेही वाचा…“ललित पाटील प्रकरणात राऊतांना बेड्या ठोका, पक्षाच कवचकुंडल ललित पाटीलला कुणी दिलं?”
हेही वाचा…“शरद पवार, ठाकरे अन् पटोले यांनी नाक घासून माफी मागावी अन्यथा..”, कुणी आणि का दिला इशारा ?