मुंबई : कंत्राटी भरतीचा जीआर काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केल्याने आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. कंत्राटी भरतीचं पाप हे उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं असून ते पाप आमच्या डोक्यावर घेणार नाही. असं फडणवीस यांनी सांगितले. त्यानंतर आता राज्यात भाजपसह विरोधी पक्षातील नेत्यांनी आज आंदोलनाची हाक दिली आहे.
हेही वाचा…“ड्रग्ज माफिया ललित पाटील त्यावेळी शिवसेनेचा नाशिक शहराचा प्रमुख होता,” फडणवीसांनी एक मोठा बॉम्ब फोडला
कंत्राटी भरतीवरून महाविकास आघाडी राज्य सरकारवर आरोप करीत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने नाक घासून जनतेची माफी मागावी. शनिवारी १० वाजेपर्यंत माफि मागितली नाही तर राज्यभर आंदोलन करू असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला होता. त्यानुसार आता भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यात आंदोलन करण्यास सुरूवात केली आहे.
हेही वाचा…“बक्कळ कमाईचा डाव पुरता फसलाय,” कंत्राट भरतीचा जीआर शासनाकडून रद्द
दरम्यान, उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि शरदप वार गटाचे नेते कंत्राटी भरतीला घेऊन राज्य सरकार आरोप करत होते. खरंतर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले हे पिसाळ्यासारखे राज्य सरकारवर खोटे आरोप करत होते. त्यामुळे त्यांनी नाक घासून जनतेची माफी मागावी. नाही तर भाजप राज्यभर मोठं आंदोलन उभं करेल. असा इशाराही बावनकुळे यांनी दिला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…महापालिका ताब्यात घेण्यासाठी अजित पवारांनी कंबर कसली, माजी नगरसेवकांची बोलवली महत्वाची बैठक
हेही वाचा…“अल्टिमेटम संपला पण शिंदे समितीला पुरावे भेटेना, समितीने मागितली ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत, जरांगे पाटील मोठा निर्णय घेणार ?
हेही वाचा…विलास लांडेंचं अपयश अजित गव्हाणेंच्या माथी, अजित पवारांच्या कार्यक्रमाला रिम्म सभागृह रिकामं
हेही वाचा…“४० मतदारसंघ, ४० प्रचारसभा अन् ४० नेत्यांची फौज,” भाजपने ‘या’ राज्यात आखली मोठी रणनिती
हेही वाचा…एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का तर ठाकरेंना मोठा दिलासा, राहुल नार्वेकरांनी घेतला मोठा निर्णय