मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचा मुद्दा येणारा काळच ठरवणार आहे. परंतु दादा लोकांना आपला पक्ष भाजपमध्ये विलिन करूनच घ्यावा लागेल. अशी आजची परिस्थिती आहे. शिवसेना फोडल्यानंतर भाजपची तीन टक्के मत कमी झाली आहेत. हा त्यांचाच सर्व्हे सांगत आहेत.यातच अजित पवारांना सोबत घेतल्याने आणखी चार टक्के मतं कमी झालीत. त्यामुळे अशा पद्धतीने मतांची घट होत असतांना ते स्वत: ला किती घेणार अन् दुसऱ्याला किती देणार ? यातली तर अनेक जण भाजपच्या वाटेवर आहेत. त्यासोबत राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील अनेक जण परतीच्या वाटेवर आली आहेत. असं राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वेडट्टीवार यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…विलास लांडेंचं अपयश अजित गव्हाणेंच्या माथी, अजित पवारांच्या कार्यक्रमाला निम्म सभागृह रिकामं
पुढे बोलतांना ते म्हणाले की, शिंदे गटाकडून २२ जागांसाठी दावा सांगितला जात आहे. परंतु त्यांचे १५ ते १६ खासदार निवडून येणार नाहीत. त्यामुळे जागा वाटून घेऊन काही फरक पडणार नाही. जनतेने निर्धार केला आहे. राज्यात सध्या तिन तिघाडा परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यात आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रित आहोत. अन् पुढे जाऊ. असंही विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
कंत्राटी भरतीचा जीआर काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केल्याने आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. कंत्राटी भरतीचं पाप हे उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं असून ते पाप आमच्या डोक्यावर घेणार नाही. असं फडणवीस यांनी सांगितले. त्यानंतर आता राज्यात भाजपसह विरोधी पक्षातील नेत्यांनी आज आंदोलनाची हाक दिली आहे. भाजपने केलेल्या पापावर आता दुरूस्ती केली आहे. त्यामुळे त्यांनी आता नाक घासून पापाचं प्रायश्चित केलं पाहिजे. आमचं चुकलं अन् आता आम्ही माफी मागतो असं म्हणून ते आज आंदोलन करीत असतील तर त्यांना बेरोजगारांच्या व्यथा समजल्या आहेत असं वाटतं. असंही वडेट्टीवार म्हणाले.
हेही वाचा…“४० मतदारसंघ, ४० प्रचारसभा अन् ४० नेत्यांची फौज,” भाजपने ‘या’ राज्यात आखली मोठी रणनिती
भाजपने स्वत: लाच जोडे मारून घेतलं पाहिजे. राज्यात बेरोजगारांना ७० हजारांची मेगा भरती कुणी केली? त्यावर तातडीने शिक्षकांची भरती करणार होते ते का केले नाही ? सरकार बदलून दीड वर्ष झालं आहे. मग तो जीआर कॅबिनेट मधून घेऊन त्यावर निर्णय घेण्याची काय गरज होती? भाजपनेच केलेली दुरूस्ती आहे. त्यामुळे हे सर्व उघड उघड बाहेर येत असतांना त्यांच्या नाकातोंडात आलं आहे. त्यामुळे ते असले धंदे करीत आहेत. असा इशाराही त्यांनी दिला.
हेही वाचा…“ड्रग्ज माफिया ललित पाटील त्यावेळी शिवसेनेचा नाशिक शहराचा प्रमुख होता,” फडणवीसांनी एक मोठा बॉम्ब फोडला
दरम्यान, महाविकास आघाडी सरकार असतांना ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता आम्ही आरक्षणाबाबत निर्णय घेत होतो. आताही घेत आहोत. पंरतु महायुती सरकारमध्ये महायुतीतील मंत्रीच आरक्षणाबाबत वेगवेगळे विधान करीत आहेत. यातच मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावे ही मागणी संविधानात बसते का ? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे पाटलांना केला. तसेच आरक्षण द्यायचं असेल तर आरक्षणाचा टक्के वाढवावा असंही म्हणत मनोज जरांगे पाटलांची मागणी योग्य नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
READ ALSO :
खंदे समर्थकाने भुजबळांची साथ सोडली, एकेकाळी भाजपला निवडणुकीत दिला होता मोठा झटका
हेही वाचा…“ललित पाटील प्रकरणात राऊतांना बेड्या ठोका, पक्षाच कवचकुंडल ललित पाटीलला कुणी दिलं?”
हेही वाचा…“शरद पवार, ठाकरे अन् पटोले यांनी नाक घासून माफी मागावी अन्यथा..”, कुणी आणि का दिला इशारा ?
हेही वाचा…महापालिका ताब्यात घेण्यासाठी अजित पवारांनी कंबर कसली, माजी नगरसेवकांची बोलवली महत्वाची बैठक
हेही वाचा…“अल्टिमेटम संपला पण शिंदे समितीला पुरावे भेटेना, समितीने मागितली ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत, जरांगे पाटील मोठा निर्णय घेणार ?