मुंबई : मागील काही दिवसापासून इंडिया आघाडीत सामील करून घेण्याची मागणी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी लावून धरली आहे. मात्र अद्यापही त्यांना महाविकास आघाडीकडून हिरवा कंदील देण्यात आला नाही. यातच आज प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईच्या वाय बी चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतल्याने चर्चांना उधाण आहे. खासदार सुप्रिया सुळे, शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याने आंबेडकर महाविकास आघाडीसोबत येणार का ? अशा राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
हेही वाचा…“ललित पाटील प्रकरणात राऊतांना बेड्या ठोका, पक्षाच कवचकुंडल ललित पाटीलला कुणी दिलं?”
डॉ.बाबासाहेब आंडेकर यांचं प्रोल्बेम ऑफ रूपी पुस्तकाच्या निमित्ताने कार्यक्रम होत. दादाभाई नवरोजी यांनी त्याठिकाणी ब्रिटिशांवर एक आरोप केला होता. तुम्ही आम्हाला लुटत आहेत. याबाबत दादाभाई नवरोजी यांनी यावर मांडणी केली नव्हती. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रोल्बेम ऑफ रूपी हा ग्रंथ लिहून ब्रिटीश कसं लुटत आहेत? हे दाखवलं होतं. त्यामध्ये रूपयाचं मुल्य जर स्थिर राहिलं तर भारतातील गरिबांची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. अशा पद्धतीने त्यांनी उल्लेख केला होता. या पुस्तकाला शंभर वर्ष झाली होती म्हणून असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावर एक वक्ता म्हणून मी त्या कार्यक्रमात गेलो होते. यावेळी सुप्रिया सुळे यांच्यासोबत कॉफी घेतली. तिथे शरद पवार देखील होते. एकूण बारा जण तिथे होतो. त्यामुळे कॉफीशिवाय दुसरं काही झालं नाही. असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.
हेही वाचा…“शरद पवार, ठाकरे अन् पटोले यांनी नाक घासून माफी मागावी अन्यथा..”, कुणी आणि का दिला इशारा ?
महाविकास आघाडीमध्ये सामील होण्यासाठी काही घडलं नाही. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होईपर्यंत काही घडणार नाही असंही वाटत आहे. यातच भाजपला माझा कायम विरोध राहिला आहे.यातच काॅंग्रेस घेत नाही म्हणून त्यांच्याकडे आस लावून बसलो आहे. असं काही नाही. यातच राज्यातील राजकीय परिस्थितीवर कोणतीही चर्चा झाली नाही. असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
राज्यात जेव्हा गावांगावत जात आहे. तेव्हा असं दिसतंय की, काही गावातं २५ ते ३० वर्ष झालेल्या तरूणाच्या हाताला अद्यापही काम नाही,तसेच त्यांचं लग्न देखील झालं नाही. अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारने सध्या फसवाफसवीचं राजकारण थांबवावं नाहीतर ते त्यांच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा देखील दिला आहे.
हेही वाचा…महापालिका ताब्यात घेण्यासाठी अजित पवारांनी कंबर कसली, माजी नगरसेवकांची बोलवली महत्वाची बैठक
जातगणना करून काहीही होणार नाही. बिहारमध्ये इतके वर्ष होऊनही त्याठिकाणी आर्थिकदृष्या काही गोष्टी साध्य झाल्या नाहीत हे उघड पडल्या आहेत. आर्थिक विषमता फार वाढली आहे. जेव्हा महाराष्ट्रात देखील जातगणना झाली तर अशी परिस्थिती दिसून येईल. मनोज जरांगे पाटील यांच्या नावाने वादळ निर्माण झालं आहे. त्यांच्याशी प्रामाणिक राहिलं नाहीतर त्यांच्यावरच उधळल्याशिवाय राहणार नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…तब्बल ३०० कार्यकर्त्यांना घेऊन भाजपच्या ‘या’ नेत्याने गाठलं मातोश्री, ठाकरेंनी शिवबंधन बांधून दिला प्रवेश
हेही वाचा…“मुंबई बरबाद व्हायला वेळ लागला, पण पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही”
हेही वाचा…” एकनाथ शिंदे गट आणि अजित दादा गटाला भाजपात विलीन करण्याची वेळ येणार”
खंदे समर्थकाने भुजबळांची साथ सोडली, एकेकाळी भाजपला निवडणुकीत दिला होता मोठा झटका