पुणे : युवा संघर्ष यात्रेला यश येतांना दिसत आहे, याची दखल सरकार घेत असल्याने कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पोलिसांकडून युवा संघर्ष यात्रेचे इनपुट आले होते. म्हणून कंत्राटी भरतीचा जीआर मागे घेतला असल्याचं आमदार रोहित पवारांनी म्हटलं आहे. कंत्राटी भरतीसह युवकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा दसऱ्याच्या दिवसापासून सुरू होत असून त्याचा शेवट नागपूरमध्ये होणार आहे. परंतु त्याआधीच सरकारने कंत्राट भरतीचा जीआर रद्द केला आहे. असं म्हणत त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा…“शरद पवार, ठाकरे अन् पटोले यांनी नाक घासून माफी मागावी अन्यथा..”, कुणी आणि का दिला इशारा ?
कालच्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस होते पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार नव्हते. महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित दादा उपमुख्यमंत्री म्हणून होते. ते तिथे असते तर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगेच सांगितलं असतं की तुम्ही खोटं बोलत आहात. कारण १४ मार्च २०२३ ला जीआर काढला होता. सगळे जीआर महायुती सरकारनेच काढले होते. सरकार आणि भाजप खोट बोलत असून सगळे पद कंत्राट भारताने भरण्याचा निर्णय त्यांच्या सरकारने घेतला होता. आम्ही काढेलला जीआर हा काही मर्यादित पदांसाठी होता. भाजप 2014 मध्ये सत्तेत आली तेव्हा रद्द का नाही केला ? असा सवाल रोहित पवारांनी फडणवीसांना केला आहे.
हेही वाचा…महापालिका ताब्यात घेण्यासाठी अजित पवारांनी कंबर कसली, माजी नगरसेवकांची बोलवली महत्वाची बैठक
पुढे बोलतांना रोहित पवार म्हणाले की, 1998 मध्येपहिला जीआर निघाला तेव्हा राज्यात कुणाचं सरकार होत ? आमच्या मोठ्या नेत्यांना माफी मागायला सांगतात. तुम्ही 1998 चा जीआर वाचा. भाजपच्या लोकांनी आमच्या नेत्याची माफी मागावी. त्यांनी नाक घासावं. असं म्हणत नव्या नोकर भरतीसाठी आदेश काढा. अडीच लाख पद रिक्त आहेत ती भरा. समिता स्थापन केल्या जात आहे. परंतु ह्या समित्या काही काम करत नाहीत. जालना पालघर अशा ठिकाणी समित्या स्थापन केल्या आहेत. त्यांनी काय काम केलं आहे ? ते आधी सांगावं.
आता बिअर साठी जीआर सरकारने काढला आहे, महाविकास आघाडी सरकारने वाईन बाबत एक निर्णय घेतला होता. तर महायुतीने त्यावेळी विरोध केला. आता बिअर विक्रीसाठी समिती काढत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी 27 रुग्णाक्याचे प्रकल्प मंजूर केले आहेत
पण यात देखील भेदभाव केला जात आहे. यासाठी सत्तेत असणाऱ्या आमदारांना निधी दिला गेला. मात्र आमच्या मतदार संघाला निधी दिला गेला नाही. देवेंद्र फडणवीस द्वेषाचे राजकारण करत आहेत. भेदभाव करू नका. सगळ्या मतदारसंघात कामे करा जर असं करत असाल तर कुणाचा मृत्यू झाला तर सरकार जबाबदार असणार असेही ते म्हणाले.
हेही वाचा…“अल्टिमेटम संपला पण शिंदे समितीला पुरावे भेटेना, समितीने मागितली ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत, जरांगे पाटील मोठा निर्णय घेणार ?
राज्यातल्या आरोग्य विभागात सगळ्यात मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. राज्याला आरोग्य संचालक नाही. निधीचे पैसे गरिबाला दिले जात नाही.आपल्या आरोग्य मंत्र्यांना हाफकीन माणूस आहे की कंपनी हे सुद्धा माहिती नाही. आरोग्य मंत्र्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. रूग्णालयांना औषधे दिली जात नाहीत. कर्मचारी भरती केली जात नाहीत. लोकसभा डोळयांसमोर ठेवून सेनेला फोडलं आणि आमचं कटुंब आणी पक्ष देखिल भाजपने फोडले. या सगळ्या नेत्यांचा वापर लोकसभेसाठी केला जाईल आणि नंतर बाहेर काढतील.
सगळे नावापुरते मंत्री असून सगळा कारभार फडणवीस करीत आहेत. सगळ्यांना भाजपच्या चिन्हावर लढवायला सांगितलं जात असून त्यांची पॉवर काढून घेतली जात आहे. अनेक नेते केवळ मुंबईत बसून फाईस साईन करीत आहेत. मुंबईच्या हॉटेलमध्ये सगळे ओएसडी फाईन घेऊन जातात तिथे का फायली नेली जात नाही.असंही त्यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…तब्बल ३०० कार्यकर्त्यांना घेऊन भाजपच्या ‘या’ नेत्याने गाठलं मातोश्री, ठाकरेंनी शिवबंधन बांधून दिला प्रवेश
हेही वाचा…“मुंबई बरबाद व्हायला वेळ लागला, पण पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही”
हेही वाचा…” एकनाथ शिंदे गट आणि अजित दादा गटाला भाजपात विलीन करण्याची वेळ येणार”
खंदे समर्थकाने भुजबळांची साथ सोडली, एकेकाळी भाजपला निवडणुकीत दिला होता मोठा झटका
हेही वाचा…“ललित पाटील प्रकरणात राऊतांना बेड्या ठोका, पक्षाच कवचकुंडल ललित पाटीलला कुणी दिलं?”