मुंबई : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाला राज्यात आता वेगळेच वळण लागत आहेत. ललित पाटील हा शिवसेना नाशिक शहराचा प्रमुख होता. असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यावरून शिंदे गटाच्या नेत्यांनीही आता उद्धव ठाकरे यांच्यावर टिका करण्यास सुरूवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा…खंदे समर्थकाने भुजबळांची साथ सोडली, एकेकाळी भाजपला निवडणुकीत दिला होता मोठा झटका
आज ठाकरे गटाचे कल्याण लोकसभेचे संपर्कप्रमुख गुरूनाथ खोत यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे दिवा शहर प्रमुख रोहित मुंडे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांच्यासोबत ३०० कार्यकर्त्यांनीही शिवबंधन बांधून ठाकरेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी ललित पाटील प्रकरणावर भाष्य केलं.
हेही वाचा…“शरद पवार, ठाकरे अन् पटोले यांनी नाक घासून माफी मागावी अन्यथा..”, कुणी आणि का दिला इशारा ?
देवेंद्र फडणवीस यांच्या प्रश्नाला उत्तर देतांना ठाकरे म्हणाले की, हे म्हणजे बॉम्बस्फोटवेळी दाऊद भाजपाध्यक्ष असल्यासारखं आहे. यावर मी दसरा मेळाव्यात सविस्तर बोलेन, असंही ठाकरे यांनी सांगितले. यातच ललित पाटीलने शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळीच्या फोटोंमध्ये दादा भूसे दिसत होते. त्यानंतर पक्षात फुट पडली अन् अनेकांनी शिंदे गटाचा मार्ग स्विकारला. पण ललित पाटील हा मात्र त्यानंतर कोणत्याही चर्चेत आला नाही. त्यामुळे आता तो अजूनही ठाकरे गटातच असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राज्यात नवी राजकीय समीकरणं जुळणार? प्रकाश आंबेडकरांनी घेतली शरद पवारांची भेट
हेही वाचा…“युवा संघर्ष यात्रेला यश, सरकारकडून दखल, अजितदादा तिथे असते तर..,” रोहित पवारांनी फडणवीसांना दिले प्रत्युत्तर
हेही वाचा…तब्बल ३०० कार्यकर्त्यांना घेऊन भाजपच्या ‘या’ नेत्याने गाठलं मातोश्री, ठाकरेंनी शिवबंधन बांधून दिला प्रवेश
हेही वाचा…“मुंबई बरबाद व्हायला वेळ लागला, पण पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही”
हेही वाचा…” एकनाथ शिंदे गट आणि अजित दादा गटाला भाजपात विलीन करण्याची वेळ येणार”