नाशिक : मराठा समाजाच्या विरोधात भूमिका घेतल्याने राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे मुंबई कृषी बाजार समितीचे संचालक आणि राष्ट्रवादीचे नेते जयदत्त होळकर यांनी राष्ट्रवादीच्या सर्व पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे भुजबळांना याचा मोठा धक्का बसला आहे. मराठा समाजाला आता आरक्षणाची गरज असून त्यांच्या सोबत आपणही राहिलं पाहिजे. यामुळे राष्ट्रवादीच्या सर्व पदाचा राजीनामा देत असल्याचं जयदत्त होळकर यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा…तब्बल ३०० कार्यकर्त्यांना घेऊन भाजपच्या ‘या’ नेत्याने गाठलं मातोश्री, ठाकरेंनी शिवबंधन बांधून दिला प्रवेश
मराठा समाज हा शेतकरीवर अवलंबून असलेला सर्वात मोठा समाज आहे. यातच बाजारभावाबाबत सरकारकडून सकारात्मक निर्णय न घेतल्याने हा समाज प्रचंंड आर्थिक परिस्थितीत सापडला आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षणाची सध्या गरज भासू लागली आहे. त्यांना आता आरक्षणाची गरज असून मराठा समाजासोबत राहिलं पाहिजे. त्यांची जी भूमिका आहे ती असली पाहिजे. त्यामुळे मी राष्ट्रवादीच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.
हेही वाचा…“मुंबई बरबाद व्हायला वेळ लागला, पण पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही”
सध्या कुठलाही पक्षात जाण्याचा विषय नाही आहे. परंतु मराठा समाज आता आरक्षणाची मागणी करीत आहे. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या भूमिकेसोबत आपलं राहिलं पाहिजे. राजकीय दृष्टीकोन ठेऊन आम्ही हा निर्णय घेतलेला नाही आहे. याची दुसरी बाजू पाहिली तर मोठ्या प्रमाणात मराठा समाज ओबीसी मध्ये गेला आहे. फक्त ठरावीक समाज राहिला आहे. त्याला आता ओबीसी समाजामध्ये घेतलं पाहिजे. ही प्रमुख मागणी आहे. असं जयदत्त होळकर म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“प्रकाश आंबेडकर जर आघाडीसोबत येत असतील तर…,”काॅंग्रेसच्या बड्या नेत्यांचं मोठं विधान
हेही वाचा…मोठी बातमी…! मराठा समाजाचे नेते विनायक मेटेंच्या पुतण्याची आ’त्म’ह’त्या’, राज्यात एकच खळबळ
हेही वाचा…“बॉम्बस्फोटच्या वेळी दाऊद भाजपचा अध्यक्ष..,” उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना दिलं जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…राज्यात नवी राजकीय समीकरणं जुळणार? प्रकाश आंबेडकरांनी घेतली शरद पवारांची भेट
हेही वाचा…“युवा संघर्ष यात्रेला यश, सरकारकडून दखल, अजितदादा तिथे असते तर..,” रोहित पवारांनी फडणवीसांना दिले प्रत्युत्तर