मुंबई : मागील काही दिवसापासून इंडिया आघाडीत सामील करून घेण्याची मागणी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी लावून धरली आहे. मात्र अद्यापही त्यांना महाविकास आघाडीकडून हिरवा कंदील देण्यात आला नाही. यातच आज प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईच्या वाय बी चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतल्याने चर्चांना उधाण आहे. खासदार सुप्रिया सुळे, शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याने आंबेडकर महाविकास आघाडीसोबत येणार का ? अशा राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर काॅंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी मोठं विधान केलं आहे.
हेही वाचा…“मुंबई बरबाद व्हायला वेळ लागला, पण पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही”
प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांची भेट घेतली. परंतु महाविकास आघाडीत येण्यासाठी काॅंग्रेसचा विरोध आहे. या प्रश्नावर बाळासाहेब थोरात म्हणाले की, देशात भाजपच्या विचाराला, त्यांच्या कार्यप्रणाली, त्यांच्या धोरणाला ज्यांचा विरोध आहे. त्यांना आम्ही सोबत घेऊ. परंतु भाजपचा विरोध हा पक्का असालया हवा. असंही ते म्हणाले.
हेही वाचा…” एकनाथ शिंदे गट आणि अजित दादा गटाला भाजपात विलीन करण्याची वेळ येणार”
दरम्यान, डॉ.बाबासाहेब आंडेकर यांचं ”प्रोल्बेम ऑफ रूपी” या पुस्तकाला शंभर वर्ष पुर्ण होत आहे. त्यानिमित्ताने एक प्रवक्ता म्हणून बोलण्यात आलं होतं. त्यामुळे वाय बी सेंटरवर गेलो असल्याची प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. तसेच या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. असं म्हणत त्यांनी आमचा आजही भाजपला विरोध असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी…! मराठा समाजाचे नेते विनायक मेटेंच्या पुतण्याची आ’त्म’ह’त्या’, राज्यात एकच खळबळ
हेही वाचा…“बॉम्बस्फोटच्या वेळी दाऊद भाजपचा अध्यक्ष..,” उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना दिलं जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…राज्यात नवी राजकीय समीकरणं जुळणार? प्रकाश आंबेडकरांनी घेतली शरद पवारांची भेट
हेही वाचा…“युवा संघर्ष यात्रेला यश, सरकारकडून दखल, अजितदादा तिथे असते तर..,” रोहित पवारांनी फडणवीसांना दिले प्रत्युत्तर
हेही वाचा…तब्बल ३०० कार्यकर्त्यांना घेऊन भाजपच्या ‘या’ नेत्याने गाठलं मातोश्री, ठाकरेंनी शिवबंधन बांधून दिला प्रवेश