मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांना दिलेली मुदत उद्या संपत आहे. अलिकडेच मराठा आरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या शिंदे समितीला पाहिजे तसे पुरावे मिळाले नसल्याने समितीने सरकारकडे एक महिन्याचा अवधी वाढवण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे यांना दिलेली मुदत संपत असल्याने सरकारकडून आता जाहिरात बाजी करण्यात येत आहे. परंतु काल केलेल्या जाहीरावर टिका झाल्यानंतर सरकारने आज पुन्हा जाहिरात दिल्याने सरकार मराठा बांधवांच्या भावनेशी खेळत आहे का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा…“प्रकाश आंबेडकर जर आघाडीसोबत येत असतील तर…,”काॅंग्रेसच्या बड्या नेत्यांचं मोठं विधान
मराठा आरक्षणाचा मुद्या राज्यात मागील काही दिवसापासून जोरदार पेटत आहे. सरकारकडून मराठा समाजाला मिळणाऱ्या सर्व योजनांची काल जाहिरात देण्यात आली होती. शुद्ध मनानं आम्ही दिलेलं संधीचं सोनं करा. आम्ही पाया मजबूत बनविला आहे. सकारात्मक ध्येयाकडे वाटचाल करा. असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय EVS करीता १० टक्के आरक्षणावर EVS आरक्षणाचा मराठा समाजाला लाभ असं म्हणत मराठा समाजाला मिळणाऱ्या योजनांची जाहिरात देण्यात आली होती. मात्र यामध्ये आरक्षणाचा उल्लेख करण्यात आला नव्हता. त्यानंतर सरकारवर जोरदार टिका झाली.
हेही वाचा…मोठी बातमी…! मराठा समाजाचे नेते विनायक मेटेंच्या पुतण्याची आ’त्म’ह’त्या’, राज्यात एकच खळबळ
सरकारने दिलेल्या जाहिरातीवर टिका झाल्यानंतर सुधारीत जाहिरात आज पुन्हा देण्यात आली. या जाहिरातीमध्ये धोरण आखले आहे. तोरण बांधण्याचे मराठा आरक्षणाचे वचन पूर्ण करण्याचे असं म्हणत मराठा समाजाच्या हक्काचे संविधानाच्या चौकटीत व न्यायालयीन प्रक्रियेत टिकणारे आरक्षण देणयास हे शासन बांधील आहे. असं जाहिरातीत म्हटलं आहे.
हेही वाचा…“बॉम्बस्फोटच्या वेळी दाऊद भाजपचा अध्यक्ष..,” उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना दिलं जोरदार प्रत्युत्तर
दरम्यान, २४ तासात जाहिरातीची सरकारकडून बदलण्यात आली आहे. तीन पक्ष सत्तेत असल्यामुळे रोज एकाची भूमिका सरकार जाहीर करत आहे का ? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. तसेच काल आर्थिक आरक्षणाचा ठळक मुद्दा होता. त्यात मराठा आरक्षण असा शब्दही नव्हता. काल आम्ही दिलेल्या संधीचं सोनं करा अशी भाषा होती. आज धोरण आखलं आहे, तोरण बांधण्याचे, मराठा आरक्षणावर अशी शाब्दिक फसवाफसवी करून सरकार आंदोलकांच्या भावनांशी खेळतंय का ? मुळात अशा एका समाजाच्या आरक्षणासाठी जाहिरात देऊन सरकार भूमिका का सांगत आहे ? मनोज जरांगे यांच्याशी बोलून सांगण्यासारखे सरकारकडे काही नाही का ? असा सवाल देखील यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शिंदे गटाचा दसरा मेळावा अडचणीत..!शिंदेंना रावण दहनाचा कार्यक्रम तिथीनुसार का नकोय? मंत्र्यांकडून मंडळांवर दबाव
हेही वाचा…तेलंगणाच्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या ‘या’ दोन नेत्यांचा कस लागणार ? पक्षानी सोपवली मोठी जबाबदारी
हेही वाचा…“प्रकाश आंबेडकरांनी निवडणुकांसाठी आघाडीसोबत आले पाहिजे,” काॅंग्रेसच्या बड्या नेत्यांनी दिले युतीचे संकेत
हेही वाचा…वाद वाढला…! “कोकणातील एकही मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही”,नारायण राणेंनंतर शिंदे गटाच्या नेत्याचा दावा
हेही वाचा…“..म्हणूनच राष्ट्रवादीच्या सर्व पदाचा राजीनामा दिला”,भुजबळांचा गड गडगडला, खंदे समर्थकाने दिला राजीनामा