पुणे : अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी माघार घेतल्याने आता ऋतुजा लटके यांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे ही निवडणुक आता बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही निवडणुक बिनविरोध व्हावी असं म्हटलं होतं. त्याशिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर ही निवडणुक बिनविरोध व्हावी अशा आशायाचं पत्र त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठवलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने भाजपवर निशाणा साधला आहे.
“उद्धव ठाकरे अन् राष्ट्रवादीला खंजीर चिन्ह द्यावं, मी आयोगाला पत्र पाठवणार”
अंधेरी पोटनिवडणुकित भाजपने माघार घेतली आहे. त्यांना उशिरला आलेले शहाणपण आहे. देवा पाहतोय ना, तरीही शिवसेनच्या लटके वहिनीला जो त्रास दिला तो कायम स्मरणात राहील. परत अशा घटना नको, नीच वृत्ती राजकारण नको. जनता मायबाप आहे त्यांच्या पुढे काही चालणार नाही लक्षात ठेवावे. असा इशारा राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी दिला आहे.
“भविष्य अंधारात ढकलण्याचे पाप करू नये”; काॅंग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
महाविकास आघाडीला आता यापुढे निवडणुक लढविण्यासाठी उमेदवार देखील मिळणार नाही. असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं होतं. त्यावर बोलताना रूपाली पाटील म्हणाल्या की, महाविकास आघाडीला उमेदवार मिळू देणार नाही. इथून सुरू झालेला प्रवास…. स्वत: च्या उमेदवाराचा पराभवाच्या भीतीने अर्ज मागे घेण्यावर येऊन थांबला आहे. राजकारणातील विद्यापीठ पवार साहेब नावाचा तरूण लोकनेता आणखी मैदानात उतरला आहे. हे लक्षात ठेवा. असं म्हणत त्यांनी बावनकुळेंना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
Read also
- “फडणवीस साहेब अंहकार बरा नव्हे, नियती तो कधी ना कधी उतरवतेच”; राष्ट्रवादीचा टोला
- अंधेरी पोटनिवडणूकीतून भाजपची माघार..! ऋतुजा लटकेंचा मार्ग मोकळा
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदें साहेब यांचावर आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल!
- “महाराष्ट्राला एक दिशा देण्याचं भुजबळांचं काम”; शरद पवारांकडून भुजबळांचा सन्मान
- “विलासरावांचं पडलेलं सरकार भुजबळांनी वाचवलं, आणि आज..” अजित पवार