बुलढाणा : राज्यात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या, तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाने मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून, त्यामुळे राज्यात निवडणूकांचं वारं वाहू लागल्याचे जाणवत आहे.
दरम्यान, या अनुषंगाने आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्टपणे माध्यमांसमोर मांडली असून, ‘महाविकास आघाडीतल्या इतर पक्षांबद्दल आम्हाला माहिती नाही. मात्र, आम्ही आगामी लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे,’ असं रोखठोक स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.
तसेच, ‘राष्ट्रवादी आमचा पारंपरिक मित्र पक्ष आहे. त्यामुळे, निवडणुकांनंतर बसून जो काही निर्णय असेल तो घेतला जाईल. परंतु, सध्यातरी आमच्या समोर त्यांचा आणि ना इतर कुठल्या पक्षाचा प्रस्ताव आहे. त्यामुळे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस स्वबळावर लढेल. त्यादृष्टीने आमची तयारी सुरु झालेली आहे,’ असं देखील ते म्हणाले आहेत. त्यामुळे, सत्तेत असलेल्या घटक पक्षांमध्ये सर्वच काही आलबेल नसल्याच्या चर्चांना, नाना पटोलेंच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा खतपाणी घातले गेले आहे.
Read Also :
- राष्ट्रवादी-शिवसेनेच्या युतीचे भाकीत करून पवारांनी काँग्रेसला धमकी दिली – नारायण राणे
- ‘हे सरकार पहाटेच्या अंधारात झालेलं नाही, उघडपणे शपथविधी घेणारं हे सरकार आहे.’
- ‘शरद पवार पंतप्रधान झाल्यास आनंदच’ – शिवसेना
- संभाजीराजेंच्या भेटीबद्दल चुकीचा अर्थ काढू नका – उदयनराजे भोसले
- का भेटले प्रशांत किशोर शरद पवारांना? अजित पवारांनी केला खुलासा