मुंबई : राज्य सरकारने शेतकऱ्यांना वीजबिलात सूट देण्याची घोषणा केली होती. मात्र, राज्यभरातून अशा अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या असून, आघाडी सरकारची ही घोषणा निव्वळ तोंडची वाफ असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
यातच, आज राज्याचे उर्जामंत्री आणि काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांनी औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलताना वीजबील माफी संदर्भात भाष्य केले असून, ‘हवं तर सवलत दिली जाईल. मात्र, वीज बील माफी शक्य नाही. या कंपन्या चालवायला पैसे लागतात, त्यामुळे बिल हे भरावंच लागेल, खरंतर वीज बिल माफ करण्याचं काम केंद्र सरकारचं आहे. त्यामुळे, केंद्राने मदत केली तर राज्य सरकारही एक पाऊल पुढे येईल.
त्यामुळे यासंदर्भात केंद्राकडून स्वतंत्र तरतूद किंवा अनुदान मिळाले, तरच काहीतरी निर्णय घेणे शक्य आहे, नाहीतर वीजबील भरणे क्रमप्राप्त आहे, असं म्हणत त्यांनी केंद्राकडे बोट दाखवलं आहे.
तसेच विरोधी पक्ष भाजपवर देखील त्यांनी यावेळी टीका केली असून, ‘हे सरकार पहाटेच्या अंधारात झालेलं नाही, उघडपणे शपथविधी घेणारं हे सरकार आहे. आम्ही सर्व पक्ष सोबत काम करत आहोत. त्यामुळे, हे सरकार पडणार नाही. सध्या राज्यात आघाडीचं सरकार उत्तम काम करत आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आमच्यात उत्तम समन्वय आहे. त्यामुळे, भाजपने सातत्याने सरकार पडेल, अशी अपेक्षा ठेवू नये,’ असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.
Read Also :
- ‘शरद पवार पंतप्रधान झाल्यास आनंदच’ – शिवसेना
- संभाजीराजेंच्या भेटीबद्दल चुकीचा अर्थ काढू नका – उदयनराजे भोसले
- का भेटले प्रशांत किशोर शरद पवारांना? अजित पवारांनी केला खुलासा
- २०२४ च्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांसोबत युती करणार – नाना पटोले
- ‘बाळासाहेब आज असते, तर त्यांनीच विमानतळाला नाव नाकारले असते!’ – छगन भुजबळ