मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या, नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाच्या वादाला आज वेगळे रूप येऊन, नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीने जोर धरला होता. यासाठी मानवी साखळी तयार केली गेली आणि अनेक लोकांनी मोकळ्या जागेवर एकत्र येऊन करून, दि. बा. पाटील यांचे नाव प्रतीकात्मक रूपाने दाखवले. तसेच, रिपाईसोबतच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली.
मात्र, नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव देण्यात येईल असे सरकारकडून स्पष्ट केले गेले असून, ‘नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव देण्याचा प्रस्ताव सिडकोने आधीच मंजूर केला आहे, अशी माहिती काल समाज माध्यमांशी संवाद साधताना, राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
दरम्यान, आज माध्यमांसमोर या मुद्द्याला उत्तर देताना, आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी, “नरो वा कुंजरोवा” भूमिका घेतली असून त्यांनी, ‘आज बाळासाहेब ठाकरे असते, तर त्यांनी विमानतळाला स्वत:चं नाव देणं नाकारलं असतं आणि जे. आर. डी. टाटा यांचं नाव सूचवलं असतं, असं सांगत, हा नामकरणाचा वाद एकत्र बसून, सामंजस्याने सोडवावा. आमचा बाळासाहेब ठाकरे आणि दि.बा. पाटील या दोन्ही नावाला पाठिंबा आहे,’ असं मत मांडून नव्या वादाला फोडणी दिली आहे.
Read Also :
- ‘शिवसेना हा “वचन पाळणारा मित्र” म्हणणे म्हणजे…’ राम कदम यांची जोरदार टीका
- ‘पिंजऱ्यातल्या वाघालाही मिश्या असतात, हिंमत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा’
- मराठा क्रांती मुक मोर्चा ही वादळापुर्वीची शांतता – संभाजीराजे
- अजित पवारांनी दिला पुणेकरांना दिलासा! निर्बंधांबाबत केली मोठी घोषणा
- सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली परमबीर सिंग यांची याचिका, नोंदवले महत्वाचे निरीक्षण