मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गुरुवारी २२ वा वर्धापनदिन साजरा झाला. यावेळी मुंबईमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात शरद पवारांनी शिवसेनेला “वचन पाळणारा मित्र” म्हटले. दरम्यान, आता याचाच संदर्भ घेऊन भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादीवर टीका केली असून, भाजप प्रवक्ते आणि आमदार राम कदम यांनी, एक व्हिडिओ शेअर करत, ‘शरद पवार यांना शिवसेना हा वचन पाळणारा मित्र आहे असे म्हणावे लागले, ही राष्ट्रवादी पक्षाची राजकीय हतबलता आहे,’ असा खोचक टोला लगावला आहे.
तसेच, त्यांनी व्हिडिओतून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचा देखील समाचार घेतला असून, ‘राऊतांनी पंतप्रधानांचे कौतुक केले. ते देशातील सर्वात मोठे नेते आहेत. त्यांच्यामुळेच भाजपला गेल्या ७ वर्षापासून यश मिळत आहे, असे सांगितले. त्यामुळेच शरद पवार यांनी, शिवसेना हा वचन पाळणार पक्ष आहे,’ असं म्हटले.
मात्र, असे तेव्हाच म्हणावे लागते, जेव्हा तो मित्र वचन पाळत नसेल. ज्या शिवसेनेने स्व. बाळासाहेब ठाकरेंचे हिंदूत्व सोडले, तो पक्ष वचन पळणारा पक्ष आहे का? पवारांना शिवसेनेला “वचन पाळणारा मित्र” असे म्हणावे लागणे, ही राष्ट्रवादी पक्षाची राजकीय हतबलता आहे. त्यांना राऊत यांनी मोदींचे केलेले कौतुक खूपच जिव्हारी लागले आहे,’ अशी टीकाही त्यांनी पवारांवर केली आहे.
दरम्यान, कालच्या कार्याक्रमात पवारांनी, ‘आपण वेगळ्या विचाराचं सरकार स्थापन केले. आपण शिवसेनेसोबत काम कधी केले नाही. पण शिवसेनेला महाराष्ट्रातल्या लोकांनी खूप वर्ष पाहिले आहे. शिवसेना हा एक विश्वास आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस पुढे आली. त्यांच्यासोबत एकत्र आलो, कुणी काहीही म्हणो, हे सरकार टिकेल आणि पाच वर्ष चालेल आणि त्यानंतर सुधा पुढे एकत्रित चांगले काम करेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.
Read Also :
- ‘पिंजऱ्यातल्या वाघालाही मिश्या असतात, हिंमत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा’
- अजित पवारांनी दिला पुणेकरांना दिलासा! निर्बंधांबाबत केली मोठी घोषणा
- सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली परमबीर सिंग यांची याचिका, नोंदवले महत्वाचे निरीक्षण
- मराठा क्रांती मुक मोर्चा ही वादळापुर्वीची शांतता – संभाजीराजे
- ‘योगी-मोदी हा वाद केवळ केंद्राचे अपयश झाकण्यासाठीच’ – नवाब मलिक