बीड : बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या घरावर काल मराठा आंदोलकांनी दगडफेक केली. त्यानंतर जयदत्त क्षीरसागर यांचा घर पेटवून दिलं. त्यासोबत गाड्याही आंदोलकांनी पेटवल्या. त्यावेळी क्षीरसागर यांचे कुटुंबीय देखील घरात होते. मात्र यावेळी त्यांच्या कुटुंबाला काहीही झालं नाही. याच पार्श्वभूमीवर क्षीरसागर यांच्या कुटुंबातील सदस्या सविता क्षीरसागर यांनी घडलेला प्रसंग सांगितला आहे.
हेही वाचा…मंत्रिमंडळाची बैठक संपन्न, मराठा समाजासाठी एकनाथ शिंदेंनी घेतले मोठे निर्णय
लग्नाझाल्यानंतर याठिकाणाचा राजकीय वातावरण पाहत आले आहे. परंतु कालचा प्रसंग पाहता अत्यंत भयावह प्रसंग होता. असा प्रसंग कधीही घडू नये. राजकारण पाहता ते फक्त राजकारण राहायला हवे, ते घरापर्यंत येऊ नये. कारण आरक्षणाचा आणि माझ्या लहान मुलाचा त्याचा काहीही संबंध नाही. कारण त्यावेळी घरात तीन महिला, तीन मुल माझे आजारी सासरे अशा परिस्थिती आम्ही घरात होतो. त्या परिस्थितीच वर्णन कुणीही करू शकत नाही. हा सर्व गोंधळ एक तास चालला होता.असं सविता क्षीरसागर म्हणाल्या.
हेही वाचा…“प्रिय बंधू मनोज जरांगे पाटील..,” राज ठाकरेंचं मनोज जरांगे पाटील यांना पत्र
माझी मुल त्या परिस्थितीत देव घरात हात जोडून बसले होते. त्यांना पहिल्यांदा असं पाहिलं होतं. कारण अशा लहान मुलांना असे अनुभव येणं फार चुकीचं आहे. त्यांना त्यावेळी काय उत्तर द्यायची? हा मोठा प्रश्न आहे. त्यानंतर आपलं जसं होईल तसं होईल, परंतु आधी आपल्या मुलांना बाहेर काढलं पाहिजे. त्यानंतर काही समाजाच्या लोकांनी आम्हाला मदत केली. मागच्या बाजूने आम्ही घरातून बाहेर पडलो. त्यानंतर पोलिस आले अन् समोरून आम्हाला बाहेर काढलं. असं सविता क्षीरसागर म्हणाल्या.
हेही वाचा…“गद्दारांच्या अपात्रतेची ‘तारीख’ ठरली !” उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
दरम्यान, त्या परिस्थिती मनात एक धडकी भरली होती. आग लागली होती. तेव्हा बाहेर पडणं आमच्याकडे पर्याय नव्हता. सगळ्यांना घेऊन आम्ही किचनच्या मागच्या बाजूने गेलो . तिथे बरेच बंधू होते. त्यावेळी त्यांनी मुलांना घेऊन बाहेर काढले. त्यानंतर पोलिस आले अन् आम्हाला समोरून काढले. असंही सविता क्षीरसागर यांनी म्हटले.
READ ALSO :
हेही वाचा…“जाळपोळ झाली तेव्हा घरात होतो, काही लोकांनी ठरवून जाळपोळ केली”, योगेश क्षीरसागरांनी दिली प्रतिक्रिया
हेही वाचा…प्रवेश बंदी असताना आलेल्या आमदार विश्वजीत कदम यांना पाठवलं माघारी
हेही वाचा…“मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षण घालवलं,” भाजपचा जोरदार पलटवार
हेही वाचा…बीड जाळपोळीच्या घटनेबाबत मोठी कारवाई होणार, फडणवीसांनी पोलिसांना दिले आदेश
हेही वाचा…“तिथे मणिपूर, जळतंय, इथे महाराष्ट्र पेटतंय., मोदी फक्त भाषण करून जातात”