मुंबई : शिवसेना १६ अपात्र आमदारांच्या प्रकरणाबाबत कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना जोरदार फटकारलं आहे. यातच येत्या ३१ डिसेंबरपर्यंत १६ आमदारांच्या अपात्र याचिकेबाबत निर्णय घेण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे. त्यामुळे गद्दारांच्या अपात्रतेची ‘तारीख’ ठरली! असल्याचा व्हिडीओ ठाकरे गटाने शेअर केला आहे. यातच उद्धव ठाकरेंनी देखील शिंदे गट तसेच विधानसभा अध्यक्षांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा…“मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी एक दिवसीय अधिवेशन बोलावा,” राष्ट्रवादीची मागणी
दसऱ्याच्या भाषणात बोललो होतो की, अपात्रतेचा निर्णय आहेच. पण त्यानिमित्ताने सर्वोच्च न्यायालयाचं महत्व आपल्या देशात काय असणार आहे, त्यावर आधारीत देशाची घटना आणि लोकशाही टिकणार आहे की नाही हेही निर्णयावरून ठरणार आहे. भारतातली लोकशाही सर्वात मोठी आहे. ती धोक्यात येणार असेल तर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार याकडे सगळ्याचं लक्ष असल्याचं ठाकरे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांचे अत्यंत विश्वासू अंतरवाली सराटीत दाखल, मनोज जरांगे पाटलांशी करणार चर्चा
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने राहुल नार्वेकरांना अत्यंत स्पष्ट शब्दांत आदेश दिला आहे. काल संध्याकाळी माझ्या वाचनात आलं की नार्वेकर म्हणाले अजून मी तो आदेश वाचलेला नाही वगैरे. त्यामुळे जर नार्वेकर मुंबईत असतील, तर त्यांना ठाकरे गटाच्या नेत्यांनी निर्णयाची एक कॉपी द्यावी. त्यांच्यासमोरही एकदा या निर्णयाचं वाचन करावं. असंही ठाकरेंनी म्हटलंय.
गद्दारांच्या अपात्रतेची ‘तारीख’ ठरली! pic.twitter.com/XYgxPK5TGY
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 31, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“सर्वात अपयशी आणि नापास गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा”, सुषमा अंधारे यांची मागणी
हेही वाचा…“तर राज्यातील सर्व ४८ खासदारांनी एकजुटीने राजीनामा द्या”, उद्धव ठाकरेंचं आवाहन
हेही वाचा…“राजकीय नेत्यांचे Apple फोन हॅक होताहेत,” जितेंद्र आव्हाडांचं ‘ते’ ट्विट चर्चेत
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटलांची फोनवरून केली २० मिनिटे चर्चा, जरांगे पाटील म्हणाले..
हेही वाचा…मराठा आरक्षणासंदर्भात राजकीय हालचाली वाढल्या, मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री राज्यपालांच्या भेटीला