पुणे : मराठा आंदोलकांकडून मागील काही दिवसांपासून राजकीय नेत्यांना गावबंदी केली जात आहे. परंतु आता थेट मराठा आंदोलक नेत्यांची घरं टार्गेट करीत आहेत. बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर मराठा आंदोलकांनी तुफान दगडफेक केली. त्यानंतर त्यांच्या गाड्या जाळण्यात आल्या आहेत. त्यामुळे बीडमधील राजकीय वातावरण चांगलचं चिघळलं आहे. यावरून आता शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार टिका केली आहे.
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांचे अत्यंत विश्वासू अंतरवाली सराटीत दाखल, मनोज जरांगे पाटलांशी करणार चर्चा
काही वर्षापुर्वी जवान मरत असताना पंतप्रधान वाईल्ड लाईप शुटींग करत होते. राज्य जळत असताना गृहमंत्री इतर राज्यात जाऊन निवडणुक पक्षाचा प्रचार झोडत आहे. सर्वात अपयशी आणि नापास गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा. अशी मागणी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.
हेही वाचा…वंचितचं पत्र अंतरवाली सराटी पोहचलं अन् जरांगे पाटलांनी घेतलं पाणी
दरम्यान, यापुर्वी देखील मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाला तेंव्हा हे महाशय राज्यात उपलब्ध नव्हते. अगदी नागपूर पाण्यात बुडाले तेंव्हा देखील ते मुंबईत हायकमांडची सेवा करण्यात बिझी होते. त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा राज्यातील जनतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा उदासीन आणि आकसपूर्ण आहे हे यानिमित्ताने उघड झाले आहे. अडचणीच्या काळात महाराष्ट्रातील जनतेला वाऱ्यावर सोडणाऱ्या या निष्क्रिय गृहमंत्र्यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने त्यांचा राजीनामा घेऊन मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी. असही सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.
काही वर्षांपूर्वी जवान मरत असताना पंतप्रधान वाईल्ड लाईफ शूटिंग करत होते.
राज्य जळत असताना गृहमंत्री इतर राज्यात जाऊन निवडणूक पक्षाचा प्रचार झोडत आहे..
सर्वात अपयशी आणि नापास गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा.@Dev_Fadnavis @AUThackeray @ShivSenaUBT_ @OfficeofUT— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) October 31, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“तर राज्यातील सर्व ४८ खासदारांनी एकजुटीने राजीनामा द्या”, उद्धव ठाकरेंचं आवाहन
हेही वाचा…“राजकीय नेत्यांचे Apple फोन हॅक होताहेत,” जितेंद्र आव्हाडांचं ‘ते’ ट्विट चर्चेत
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटलांची फोनवरून केली २० मिनिटे चर्चा, जरांगे पाटील म्हणाले..
हेही वाचा…मराठा आरक्षणासंदर्भात राजकीय हालचाली वाढल्या, मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री राज्यपालांच्या भेटीला
हेही वाचा…“मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी एक दिवसीय अधिवेशन बोलावा,” राष्ट्रवादीची मागणी