मुंबई : मागील एक महिन्यापासून शांततेत सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला आता हिसंक वळण लागले आहे. काल बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीचे कार्यालय आणि आमदार जयदत्त क्षीरसागर आणि आमदार प्रकाश सोळंके यांचं घर आंदोलकांनी पेटवून दिलं. त्यानंतर राज्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षणासंदर्भात राजकीय हालचाली वाढल्या असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…“एकनाथ शिंदेंनी फडणवीसांचा राजीनामा घेऊन मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी,” कुणी केली मागणी ?
सकाळीच मनोज जरांगे पाटलांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल २० मिनिटे फोनवरून चर्चा केली. या चर्चेत त्यांनी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. तर सरसकट मराठ्यांना आरक्षण देण्यात यावे, या मागणी मनोज जरांगे पाटील ठाम राहिले असून त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही तशाप्रकारे सांगितल आहे.
हेही वाचा…मराठा आरक्षणासाठी काॅंग्रेसच्या ‘या’ आमदाराने दिला राजीनामा, मराठा समाज आक्रमक
दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत तात्काळ एक दिवसाचं विशेष अधिवेशन घेण्यात यावे, या मागणी काल विरोधी पक्षाचं शिष्ठमंडळ राज्यपालांच्या भेटीला गेले होते. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार आता विशेष अधिवेशन बोलवणार का ? अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी एक दिवसीय अधिवेशन बोलावा,” राष्ट्रवादीची मागणी
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांचे अत्यंत विश्वासू अंतरवाली सराटीत दाखल, मनोज जरांगे पाटलांशी करणार चर्चा
हेही वाचा…वंचितचं पत्र अंतरवाली सराटी पोहचलं अन् जरांगे पाटलांनी घेतलं पाणी
हेही वाचा…नाशिकमध्ये शिंदे गटाच्या खासदाराने दिला राजीनामा, मराठा आरक्षणासाठी आमदार-खासदारांचे राजीनामे सत्र सुरू
हेही वाचा…बीडमध्ये मराठा समाज आक्रमक, राष्ट्रवादीचं कार्यालय अन आमदारांचं घरही पेटवलं