पुणे : मराठा आंदोलकांकडून मागील काही दिवसांपासून राजकीय नेत्यांना गावबंदी केली जात आहे. परंतु आता थेट मराठा आंदोलक नेत्यांची घरं टार्गेट करीत आहेत. बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर मराठा आंदोलकांनी तुफान दगडफेक केली. त्यानंतर त्यांच्या गाड्या जाळण्यात आल्या आहेत. त्यामुळे बीडमधील राजकीय वातावरण चांगलचं चिघळलं आहे. या घटनेवरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
हेही वाचा…मोदींचा उल्लेख करत मनोज जरांगे पाटलांनी दिला अजून एक इशारा, “आंदोलनाचा तिसरा टप्पा पेलणार नाही”
महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. लोकप्रतिनिधींवर हल्ले होत आहेत. त्यांची घरे जाळली जात आहेत. आरक्षणाच्या मागणीचे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे. या काळात राज्याच्या गृहमंत्र्यांनी महाराष्ट्रात ठाण मांडून बसणे आवश्यक आहे. परंतु हे महोदय छत्तीसगडमध्ये निवडणुक प्रचारात व्यस्त असल्याची टिका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
हेही वाचा…मराठा समाजाला आरक्षण मिळणार ? दुसरीकडे एकनाथ शिंदे अपात्र होणार ? कोर्टात पार पडली मोठी सुनावणी
दरम्यान, यापुर्वी देखील मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाला तेंव्हा हे महाशय राज्यात उपलब्ध नव्हते. अगदी नागपूर पाण्यात बुडाले तेंव्हा देखील ते मुंबईत हायकमांडची सेवा करण्यात बिझी होते. त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा राज्यातील जनतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा उदासीन आणि आकसपूर्ण आहे हे यानिमित्ताने उघड झाले आहे. अडचणीच्या काळात महाराष्ट्रातील जनतेला वाऱ्यावर सोडणाऱ्या या निष्क्रिय गृहमंत्र्यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने त्यांचा राजीनामा घेऊन मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी. असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…मराठा आरक्षणासाठी काॅंग्रेसच्या ‘या’ आमदाराने दिला राजीनामा, मराठा समाज आक्रमक
हेही वाचा…मराठा आरक्षणासाठी भाजपच्या आमदाराने दिला राजीनामा, तर दुसऱ्या बाजूला भाजपच्याच आमदाराचा फोडलं ऑफिस
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांचा यवतमाळ जिल्ह्यात कार्यक्रम अन् दुसरीकडे शेतकऱ्याने घेतला ग’ळ’फा’स’
हेही वाचा…” राज्यात राष्ट्रवादीच्या आमदाराचं घर जाळलं, अन् देवेंद्र फडणवीस छत्तीसगडमध्ये पक्षाचा प्रचार करताहेत
हेही वाचा…मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा? शिंदे समितीचा पहिला अहवाल सादर