मुंबई : शिंदे समितीने केलेल्या सर्व्हेमध्ये ११ हजार ५३० कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे कुणबी नोंदी सापडलेल्या मराठ्यांना तात्काळ कुणबी दाखले देण्यात येणार आहेत. त्यामुळे कोणीही टोकाचं पाऊल उचलू नका. असं भावनिक आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठ्यांना केलं आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे. तरी देखील मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम असून सरकार अजून मोठा इशारा दिला.
हेही वाचा…“राजीनामा देऊन तुम्ही उपकार करता का ?” हेमंत पाटील आणि मराठा आंदोलकांमध्ये शाब्दिक चकमक
राज्याचे महुसल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा काही वेळापुर्वी फोन आला, अन् उद्या मंत्रिमंडळात कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतो असं सांगितलं. तसेच तुम्हाला सरसकट मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे. तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहणार. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याधिकाऱ्यांना उद्या बोलवा आणि निर्णय घ्या. सरकारला आता कोणतीही मुदत वाढ दिली जाणार नाही. त्याला आमचा विरोध आहे. असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
हेही वाचा…“मराठा समाजाने षडयंत्र ओळखावे” असीम सरोदे यांनी व्यक्त केली शक्यता
आमचं आंदोलन शांततेच चालंल आहे. उलट आमच्याच आंदोलनाला कुणीतरी गालबोट लावत आहेत. उलट मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या काही मंत्र्यांकडून उलट बोललं जात आहे. त्यामुळे त्यांनीच त्यांचे लोकं आवारयला हवे. आमचे लोक शांततेत आंदोलन करीत आहेत. १ नोव्हेंबरपासून आंदोलनाचा तिसरा टप्पा सुरू होणार आहे. क्युरेटिव्ह पिटीशन हा आमचा विषय नाही. आम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळायला हवे. मराठा आरक्षणाबाबत तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलले का ? तसेच केंद्र सरकारने हस्तक्षेप केल्याशिवाय क्युरीपिटीशन केलं जात नाही. तसेचं आम्ही अर्धवट आरक्षण घेणार नाही. असंही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…मराठा समाजाला आरक्षण मिळणार ? दुसरीकडे एकनाथ शिंदे अपात्र होणार ? कोर्टात पार पडली मोठी सुनावणी
हेही वाचा…“कुणीही टोकाचं पाऊल उचलू नका,” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं भावनिक आवाहन, घेतला ‘हा’ निर्णय
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या आमदाराच्या घरावर आधी तुफान दगडफेक, मग थेट गाड्याच जाळल्या, मराठा आंदोलक आक्रमक
हेही वाचा…अखेर प्रश्न सुटला..! मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारचा मोठा निर्णय ?
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराच्या घरावर मराठा आंदोलकांची तुफान दगडफेक, सहा गाड्याही फोडल्या