मुंबई : गेल्या सहा दिवसापासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांची तब्येत बिघडली आहे. तर दुसरीकडे मराठा समाजाकडून आरक्षणच्या मागणीसाठी एल्गार पुकारला आहे. संपुर्ण राज्यात आता मराठा समाजाकडून आंदोनल केलं जात असल्याने सरकारवर याचा मोठा दबाव आला आहे. त्यामुळे आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा…मराठा आरक्षणासाठी राजधानी दिल्लीत उपोषण, आंदोलकांना पोलिसांकडून त्रास
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्य सरकारकडून शिंदे समिती स्थापन करण्यात आली. या समितीने मागील काही दिवसात मराठवाड्यात जाऊन कुणबी नोंदीच्या उल्लेख असलेल्यांची चौकशी केली होती. त्यानुसार काही प्रमाणात शिंदे समितीला कुणबी जातीचा उल्लेख असल्याच्या नोंदी सापडल्या आहेत.
हेही वाचा…बंजारा समाजाचा मोठा नेता शरद पवारांच्या गळाला, पक्षाने दिली लगेचच मोठी जबाबदारी
दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक आज संपन्न झाली. या बैठकीत शिंदे समितीने मराठा आरक्षणासंदर्भात अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. या अहवालानुसार ज्यांच्या कुणबी जातीचा उल्लेख आहे. त्यांना उद्यापासून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराच्या घरावर मराठा आंदोलकांची तुफान दगडफेक, सहा गाड्याही फोडल्या
हेही वाचा…“राजीनामा देऊन तुम्ही उपकार करता का ?” हेमंत पाटील आणि मराठा आंदोलकांमध्ये शाब्दिक चकमक
हेही वाचा…“मराठा समाजाने षडयंत्र ओळखावे” असीम सरोदे यांनी व्यक्त केली शक्यता
हेही वाचा…मराठा आरक्षणासाठी खासदारकीचा पडला पहिला राजीनामा, पत्रात मांडल्या तीव्र भावना
हेही वाचा…“समाजाच्या मृत देहावर आरक्षणाचा आदेश सरकार ठेवणार का?” सरकारला ठाकरेंचा संतप्त सवाल