मुंबई : मराठा आरक्षणासाठी बसलेल्या मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांची तब्येत आता दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. यात दुसऱ्या बाजूला संपुर्ण राज्यात मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू केलं असून अनेक ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा मराठा समाजाकडून घेण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे.
हेही वाचा…‘ते’ मोदी सरकारचेच अपयश, शरद पवारांवर टिका केल्यानंतर राष्ट्रवादीचा हल्लाबोल
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत चालली आहे. सरकार त्यांच्या जीवाशी खेळण्याचे राजकारण करीत असेल तर महाराष्ट्राच्या सामाजिक एकतेला ते चुड लावीत आहेत. मराठा समाज त्यांचे हक्क मागत आहे. व ते त्यांना मिळालया हवे. ओबीसी, आदिवासी सह इतर समाजाच्या हक्कांना धक्का न लावता मराठा, धनगर, समाजाला त्यांचे हक्काचे टिकणारे आरक्षण मिळायला हवे. अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे.
हेही वाचा…“मराठा आरक्षणाचा प्रश्न एक दोन दिवसात सुटणार ?” शिंदेंच्या मंत्र्यांनी दिलं शुभ संकेत
जरांगे पाटील उपोषण करीत आहेत पण आरक्षणासाठी लोक रोज आत्महत्या करीत आहेत. समाजाच्या मृत देहावर आरक्षणाचा आदेश सरकार ठेवणार आहे काय? असा खोचक सवाल ठाकरेंनी शिंदेंना केला आहे. सरकार मन की बात करत आहे. पण त्यांचे मन निर्दय आहे. जरांगे पाटील यांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांची भूमिका दिसत नाही. असंही त्यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…मराठा आरक्षणासाठी राजधानी दिल्लीत उपोषण, आंदोलकांना पोलिसांकडून त्रास
हेही वाचा…बंजारा समाजाचा मोठा नेता शरद पवारांच्या गळाला, पक्षाने दिली लगेचच मोठी जबाबदारी
हेही वाचा…“अजित पवारांना शब्द दिला होता अन् तो आम्ही पूर्ण केला,” देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
हेही वाचा…“एकनाथ शिंदे अपात्र झाले तरी तेच मुख्यमंत्री राहतील,” फडणवीसांनी सांगितलं राजकीय गणित
हेही वाचा…“तीन दिवसांत ६ मराठा तरूणांनी संपवलं जीवन”, मराठा समाज आक्रमक