मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत असून ठिकठिकाणी राजकीय नेत्यांच्या गाड्या आडवून निषेध व्यक्त केला जात आहे. तर उद्यापासून प्रत्येक ठिकाणी साखळी उपोषण सुरू करावे, या उपोषणाच्या दरम्यान कुणाला काही झालं तर सरकार जबाबदार राहिल असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलं आहे. तर दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षणाचा विषय एक दोन दिवसात सुटेल असं शिंदे गटातील आमदार आणि मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितलंय.
हेही वाचा…एकनाथ शिंदेंना मोठा झटका, राष्ट्रवादीच्या माजी आमदाराची घरवापसी, आज होणार पक्षप्रवेश
उच्च न्यायालयाचे वकिल प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तपासण्या करीत आहेत. अत्यंत वेगाने काम सुरू आहे. परंतु अशा पद्धतीचा एखादा निर्णय घ्यायचा असेल तर त्याचा खोलवर विचार महाराष्ट्र राज्य सरकार करीत आहे. आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री मराठा आरक्षणावर बारिक लक्ष ठेऊन आहेत. एकंतरीत पाहता मराठा आरक्षणाचा विषय एक ते दोन दिवसात सुटेल अशी मला आशा आहे. असं तानाजी सावंत यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा…“एकनाथ शिंदे यांच्यामुळेच भाजपला पुन्हा प्रतिष्ठा मिळाली”, फडणवीसांचा तो व्हिडीओ अन् शिंदे गटाने दिलं उत्तर
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी कोणीच आत्महत्या करू नये. मराठ्यांनी लढून आरक्षण मिळवायचे आहे. मराठा आरक्षणाचा लढा हा शांततेतच लढायचा आहे. मराठा समाजाप्रमाणेच धनगर आणि मुस्लिम समाजालाही आरक्षणाची गरज आहे. मात्र सरकारने गोडगोड बोलून या समाजालाही आरक्षणापासून दुर ठेवलं आहे. धनगर आणि मराठा समाज एकत्र आल्यास दोघांनाही न्याय मिळू शकतो. असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…‘तो’ लाडका कंत्राटदार कुणाचा ? काळ्या यादीत टाकणार का? आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
हेही वाचा…सरकार मायबाप तयार रहा…! ‘या’ मागण्यांसाठी लवकरच वंचितचा दणका मोर्चा नागपूरात धडकणार
हेही वाचा…“2024 मध्ये आम्हाला कुणीही रोखू शकणार नाही, “आघाडीच्या ‘या’ नेत्यांनी दिला सुचक इशारा
हेही वाचा…“किती हा वेडेपणा, काहीतरी डोकं ठिकाणावर आहे का”, ‘त्या’ व्हिडीओबाबत फडणवीसांचं स्पष्टीकरण
हेही वाचा…“६ हजार कोटीच्या कामांची घोषणा केली, नारळ फोडला, पण कामे तशीच”, आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप