मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा रस्त्याच्या कामांमध्ये झालेल्या घोटाळ्यावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मुंबई, नवी मुंबईसह नाशिक, पुणे, ठाणे अशा महानगरपालिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
हेही वाचा…बालेकिल्ल्यात अजित पवारांची नाचक्की, मराठा समाजाने दिला मोठा दणका
ज्या शहरांमध्ये प्रशासक आहेत. त्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे सुरू आहे. गेले १० ते २० महिने आम्ही रस्त्याचा विषय मांडत आहोत. मुंबईत पाच पॅकेट कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यांपैकी एका कॉन्ट्रॅक्टरला टर्मीनेशन नोटीस गेली आहे. या नोटीशीला कंत्राटदारानं उत्तर दिलं. त्याची सुनावणी महापालिकेत या आठवड्यात होणार आहे. या सुनावणीनंतर कंत्राटदारावर कारवाई होत की खोके घेऊन कारवाई थांवबली जाते हे आम्हाला बघायला हवं. असंही ठाकरेंनी म्हटलंय.
हेही वाचा…“एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्री पद धोक्यात, शिंदेंना मोदी- शाहांकडून संदेश,” बड्या नेत्याचा दावा
एका वर्षात खड्डेमुक्त मुंबई करू असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं. मुंबईत रस्त्याची कामे १ ऑक्टोबर ते ३१ मे पर्यंत पूर्ण होतील असं राज्य सरकारने सांगितलं आहे. पण मुंबईत एकाही रस्ते कामला सुरूवात अजूनही झाली नाही. अडीच हजार कोटींची कामे तशीच्या तशी पडून आहेत. ट्रॅफिक पोलिसंच्या एनओसी न मिळाल्याचे दाखवून रस्त्याची कामे रखडवली जात आहेत. मोठा गाजावाजा करून सहा हजार कोटीच्या कामांची घोषणा केली, नारळ फोडला. पण ती कामेही तशीच पडून असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
READ ALSO :
हेही वाचा…एकनाथ शिंदेंना मोठा झटका, राष्ट्रवादीच्या माजी आमदाराची घरवापसी, आज होणार पक्षप्रवेश
हेही वाचा…“एकनाथ शिंदे यांच्यामुळेच भाजपला पुन्हा प्रतिष्ठा मिळाली”, फडणवीसांचा तो व्हिडीओ अन् शिंदे गटाने दिलं उत्तर
हेही वाचा…“समाजाला आरक्षण न दिल्यास हिवाळी अधिवेशन बंद पाडू”, मराठा आमदारांनी दिला सरकारला कडक इशारा
हेही वाचा…शेतकऱ्यांसाठी काय केलं ? थेट आकडेवारीच जाहीर करत शरद पवारांनी मोदींना दिलं प्रत्युत्तर
हेही वाचा…“अजित पवारांना दु: ख झालं का ? ते समाजापेक्षा मोठे नाहीत”, जरांगे पाटलांनी अजित पवारांना फटकारलं